Title

Astrology Blog by Anagha Bhade


Friday 28 February 2014

पत्रिकेतील नेपच्युन

 नेपच्युन हा ग्रह पृथ्वीपासून खूप लांब आहे . नेपच्यून म्हणजे गूढता , कल्पना शक्ती , intuition power,तरलता ,हळुवारपणा ,संवेदनक्षमता ,भावनाशीलता,कोमलता.

 नेपच्यूनला स्वत:ची रास नाही . परंतु जलराशीतील नेपच्यून जास्त प्रभावी असतो .जे ज्योतिषी पत्रिकेचा फारसा analysis न करता भविष्य सांगतात/ अंदाज वरतवतात आणि ज्यांचे अंदाज खरे होतात त्या ज्योतिषांच्या पत्रिकेतील नेपच्युन प्रभावी असतो ज़े ज्योतिषी पत्रिकेचा व्यवस्थित analysis करून भविष्य सांगतात/ अंदाज वरतवतात आणि ज्यांचे अंदाज खरे होतात त्या ज्योतिषांच्या पत्रिकेतील बुध जास्त  प्रभावी असतो असे म्हणायला हरकत नाही.

सूचक स्वप्ने पडणार्यांच्या पत्रिकेत पण नेपच्यून प्रभावी असतो.

प्रथम स्थानातील नेपच्यून व्यक्तीस भावनाप्रधान बनवतो . 

द्वितीय स्थानात असता गूढ मार्गाने धनार्जन ,

 तृतीय स्थानी  असता उत्तम कल्पना शक्ती देतो लेखक किंवा कवींच्या पत्रिकेत तृतीयातील नेपच्यून त्या विषयात उत्तम प्रगती दाखवतो . 

चतुर्थ स्थानात पाप ग्रहांबरोबर असता  गृहसौख्य देत नाही . 

 पंचमात नेपच्यून असेल तर सूचक स्वप्ने पडणे ( intuition ) ह्याची शक्यता जास्त  असते. पंचमात नेपच्यून असणाऱ्या व्यक्ती खूप भावनाप्रधान असतात .तसेच नेपच्यून हा गुढतेशी संबंधित ग्रह असल्याने पंचमात असता पंचम हे विद्या स्थान असल्यामुळे गूढ विषयाचा अभ्यास पण करण्याकडे कल असतो उदा . ज्योतिष , तंत्र मंत्र विद्या , जादू  इ .
 शुक्र- नेपच्यून शुभ योग हे कलेत प्रगती दाखवतात  . नेपच्युन वेगवेगळ्या music instruments शिकण्यात विशेष करून तंतू वाद्य म्हणजे गिटार ,सतार , व्हायोलीन इ.पंचमातील नेपच्यून उच्च प्रतिभाशक्ती देतो .

षष्ठ स्थानातील नेपच्यून गूढ , अनाकलनीय आजार देण्याची शक्यता असते  . 

सप्तमातील नेपच्यून इतर कुयोग असता वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने फारसा चांगला नाही . 

अष्टमात असता गूढ मरण येण्याची शक्यता  असते म्हणजे कशामुळे मरण आले ते काळातच नाही . चुकीच्या औषधामुळे येणारे मरण , विषप्रयोगामुळे , गुदमरून मरणे इ. गोष्टी यात होतात .

नवम स्थानातील नेपच्यून जलप्रवास दाखवतो . आजकाल लोक विमान प्रवास करत असल्याने समुद्रावरून  प्रवास असे म्हणता येईल . थोडक्यात म्हणजे 'परदेशप्रवास ' .तसेच नवमातील नेपच्यून जर गुरूशी नवपंचम योग करत असेल तर चांगल्या प्रकारची अध्यात्मिक प्रगती दाखवतो . इथला नेपच्यन गूढ शास्त्र अभ्यासाला पण चांगला असतो . 

दशमस्थानातील नेपच्यून सर्वसाधारण पणे इथला नेपच्यून ह्या ग्रहावरून पहिले जाणारे व्यवसाय दाखवतो .  उदा मनोसोपचार तज्ञ , जादुगार, ज्योतिषी , कलाकार इ. अर्थात त्यासाठी पत्रिकेतील इतर योग पण पोषक असावे लागतात . 

एकादश / लाभ स्थानातील नेपच्यूनला हे स्थान फारसे चांगले नाही मैत्रीत किंवा आर्थिक लाभत फसवणूक होऊ शकते .

व्यय स्थानातील नेपच्यूनला सुद्धा हे स्थान तितकेसे चांगले नाही . बाकी पत्रिका बिघडली असल्यास शारीरिक त्रास , गुन्हेगारी, लबाड लोकांकडून त्रास दाखवतो .

कोणत्याही ग्रहाची स्थानगत फळे जरी लिहिली असली तरी ती दर वेळेस तशी मिळतिलच असे नाही . कारण प्रत्येक  ग्रहाचे इतर होणारे योग, त्या ग्रहाला मिळालेली रास , त्या ग्रहाची अवस्था  अशा इतर बर्याच गोष्टींवर ते अवलंबून असते .
बिघडलेल्या नेपच्यून वरून सर्वसाधारण पणे मानसिक आजार पहिले जातात  जसे अतिविचारने  किंवा तणावामुळे निर्माण होणारे  आजार , वेड लागणे , झोप न येणे इ. तसेच विषबाधा ह्या विषयाशी पण नेपच्यून सबंधित असतो .

ज्यांच्या पत्रिकेत नेपच्यून शुभ व बलवान आहे असे लोक  मनोसोपचार तज्ञ ,ज्योतिषी,वादक ,चित्रकार, कवी,लेखक तत्वज्ञ इ. होऊ  शकतात .

नेपच्यून चे रत्न ओपेल आहे .नेपच्यून चा थेट परिणाम आयुष्यावर होत नसल्याने महादशेत नेपच्यूनला स्थान दिलेले नाही.

Friday 14 February 2014

स्तोत्र का म्हणावीत ?


बऱ्याच लोकांना जेव्हा जेव्हा काही अडचणी येतात त्या वेळेसच पत्रिकेची आठवण होत असते . अर्थात त्यात काही फारसे चूक किंवा आश्चर्य पण नाही कारण ज्यांचे सगळे चांगले चालले आहे त्यांना कशाची गरजच नाही .

आयुष्यात प्रयत्नांना फार महत्व आहे . ज्योतिषशास्त्रात पण प्रयत्नांना खूप महत्व आहे . फक्त प्रयत्न कोणत्या काळात ,कोणत्या दिशेने करायचे ह्याचे मार्गदर्शन पत्रिकेतून मिळते . पण बर्याच वेळा प्रयत्न करूनही यश येत नाही अशावेळेस मग नैराश्य यायला लागते अशावेळेस स्तोत्रांचा खूप उपयोग होतो . स्तोत्र माणसाला एक मानसिक positivity देतात . माणसाचे मन प्रसन्न व शांत असेल तर हाती घेतलेल्या कामात यश येते मग ते शिक्षण असो नोकरी किंवा व्यवसाय .संतती विषयक प्रश्नामध्ये सुद्धा स्तोत्र म्हणून संतती होईल असे नव्हे तर जर काही medical tratment  वगेरे घेत असतील तर स्तोत्रांमुळे एक positive attitude निर्माण होतो व treatment यशस्वी होण्यास एका अर्थी मदतच होते असे वाटते . हेच logic सगळ्या बाबतीत apply होते . आजारी व्यक्ती पण काही treatment घेत असेल तर , घरात काही कलह असतील , व्यवसाय , नोकरी मध्ये काही अडचणी असतील तर स्तोत्रांमुळे  मन एकाग्र होणे , शांत होणे , positive attitude इ. गोष्टी साध्य होऊन प्रगतीच होते . आता ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत अशा गोष्टीना सामोरे जाण्याची मानसिक ताकद पण स्तोत्रामुळे मिळते .

कोणती स्तोत्रे म्हणावीत हे खरे तर प्रत्येकाचा वैयक्तिक choice आहे परंतु आपल्या कुलदेवतेची उपासना जरूर करावी त्या व्यतिरिक्त नवग्रह स्तोत्र हे ग्रहपीडा होऊ नये म्हणू व महलक्ष्मि अष्टक हे आर्थिक स्थैर्या  करता म्हणतात . हि दोन्हीही स्तोत्रे मला स्वत: ला आवडतात . स्तोत्रे लहान आहेत व पटकन म्हणून होतात म्हणजे ज्यांना वेळ नाही त्यांना पण दिवसभरातून ३-४ मिनिटे वेळ नक्कीच काढता येईल   .अथर्वशीर्ष पण मला खूप आवडते . मला स्तोत्रांविषयी फारशी माहिती नाही परंतु जो काही थोडासा अनुभव आहे तो लिहिला आहे .

मी वर म्हटले तसे प्रयत्नांना सगळ्यात जास्त महत्व आहे infact ते योग्य प्रकारे करता येण्याचे सामर्थ्य स्तोत्रांमुळे मिळते .माणसाला अहंकार राहत नाही .

स्तोत्रांहून जास्त महत्व खरेतर चांगल्या कर्माना आहे .

जे आयुष्य दिले आहे त्यातले सगळे बरे ,वाईट भोग काही तक्रार न करता भोगणे हे उत्तम  परंतु  हे सामान्य माणसाला शक्य होत  नाही ते अध्यात्मिक प्रगती झालेल्या व्यक्तीसच शक्य आहे . सामान्य माणूस हा आज पेक्षा उद्याचा दिवस कसा आनंदात जाईल किंवा मुले,जोडीदार , नातेवाईक , मित्र मंडळी ह्यांच्यासाठी कायमच काहीतरी मागत असतो .

नवग्रह स्तोत्र व महलक्ष्मी अष्टक  इथे देत आहे .

नवग्रह स्तोत्र : 

जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महदद्युतिम् I 
तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम् II १ II 

दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम् I 
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम् II २ II 

धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् I 
कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् II ३ II 

प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम् I 
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् II ४ II 

देवानांच ऋषीनांच गुरुं कांचन सन्निभम् I 
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् II ५ II 

हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् I 
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् II ६ II 

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् I 
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् II ७ II 

अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम् I 
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् II ८ II 

पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम् I 
रौद्रंरौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् II ९ II 

इति श्रीव्यासमुखोग्दीतम् यः पठेत् सुसमाहितः I 
दिवा वा यदि वा रात्रौ विघ्न शांतिर्भविष्यति II १० II 

नरनारी नृपाणांच भवेत् दुःस्वप्ननाशनम् I 
ऐश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम् II ११ II 

ग्रहनक्षत्रजाः पीडास्तस्कराग्निसमुभ्दवाः I 
ता सर्वाःप्रशमं यान्ति व्यासोब्रुते न संशयः II १२ II 

II इति श्रीव्यास विरचितम् आदित्यादी नवग्रह स्तोत्रं संपूर्णं I



महालक्ष्मी अष्टक 


नमस्तेऽस्तु
महामाये

श्रीपीठे

सुरपूजिते

शङ्खचक्रगदाहस्ते
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥१॥

नमस्ते
गरुडारूढे
कोलासुरभयंकरि

सर्वपापहरे
देवि
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥२॥

सर्वज्ञे
सर्ववरदे
सर्वदुष्टभयंकरि

सर्वदुःखहरे
देवि
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥३॥

सिद्धिबुद्धिप्रदे
भुक्तिमुक्तिप्रदायिनि

मन्त्रमूर्ते
सदा
देवि
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥४॥

आद्यन्तरहिते
आद्यशक्तिमहेश्वरि

योगजे
योगसम्भूते
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥५॥

स्थूलसूक्ष्ममहारौद्रे
महाशक्तिमहोदरे

महापापहरे
महाशक्तिमहोदरे
देवि
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥६॥

पद्मासनस्थिते
देवि
परब्रह्मस्वरूपिणि

परमेशि
जगन्मातर्महालक्ष्मि
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥७॥

श्वेताम्बरधरे
देवि
नानालङ्कारभूषिते

जगत्स्थिते
जगन्मातर्महालक्ष्मि
महालक्ष्मि
नमोऽस्तुते
॥८॥

महालक्ष्म्यष्टकं
स्तोत्रं
यः
पठेद्भक्तिमान्नरः

सर्वसिद्धिमवाप्नोति
राज्यं
प्राप्नोति
सर्वदा
॥९॥

एककाले
पठेन्नित्यं
महापापविनाशनम्

द्विकालं
यः
पठेन्नित्यं
धनधान्यसमन्वितः
॥१०॥

त्रिकालं
यः
पठेन्नित्यं
महाशत्रुविनाशनम्

महालक्ष्मिर्भवेन्नित्यं
प्रसन्ना
वरदा
शुभा
॥११॥


Monday 10 February 2014

पत्रिकेतील राहु व केतू

पत्रिकेत शनि खालोखाल कोणाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे राहू केतूची .बर्याच वेळा कालसर्प योग , पितृ दोष अशा बर्याच प्रकारामध्ये राहू,केतू अडकलेले असतात . ( पितृदोषा बद्दल आधी लिहिले आहेच ) 

सगळ्यात आधी कालसर्प योग म्हणजे काय ते बघू , जर पत्रिकेतील सर्व ग्रह राहू व केतू च्या मध्ये असतील तर कालसर्प योग आहे असे म्हणतात . 

उदा . समजा प्रथम स्थानी राहू आहे व सप्तम स्थानी केतू आणि बाकी सगळे ग्रह १ ते ७  ह्या स्थानांमध्ये आहेत तर त्या पत्रिकेत कालसर्प योग आहे असे म्हणतात . पण खरेतर ह्या बाबत दोन मते आहेत एक तर कालसर्प योग आहे म्हणून त्रास त्या व्यक्तीस होतात त्यासाठी त्रब्यकेश्वर ला जाऊन 'नारायण नागबली 'हा विधी करण्याचा सल्ला दिला जातो . दुसरे मत असे आहे कि आपल्याकडे आधीच्या काळात कालसर्प नावाचा कोणताही योग नाही व त्यासाठी कोणताही विधी करण्याची गरज नाही .मला सुद्धा दुसरे मत जास्त पटते कारण कालसर्प असलेल्या कितीतरी यशस्वी आणि सुखी उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच  .

आता राहू केतूची इतर माहिती बघू . राहू व केतू हे खरेतर ग्रह नाहीत तर राहू केतू हे पृथ्वीची कक्षा व चंद्राची कक्षा ज्या दोन ठिकाणी छेदतात ते छेदन बिंदू आहेत .परन्तु त्यांना पत्रिकेत ग्रहांचा दर्जा दिला आहे . ह्यावरूनच त्यांचे महत्व लक्षात  येईल . 

गूढता , पाशवी मंत्र तंत्र विद्या ,जुगार ,गारुडी विद्या , विषप्रयोग,खोटेपणा  , बंधन योग इ. गोष्टींचा कारक राहु ला समजले जाते .राहुला सर्पाच्या तोंडाची उपमा दिली आहे .जेव्हा आपण म्हणतो कि एखादा ग्रह पत्रिकेत बिघडला आहे तेव्हा आपण त्या ग्रहाचा कोणत्यातरी अशुभ ग्रहाशी कुयोगाबाबत बोलत असतो .अशावेळेस जर कोणताही ग्रह जर राहू च्या युतीत ( साधारण ४ अंश )असेल तर तो ग्रह बिघडला आहे असे समजावे . अशावेळेस त्या ग्रहाच्या कारकत्वानुसार काही वाईट फळे मिळण्याची शक्यता वाढते . उदा . जर गुरु -राहू युती असेल तर संतती कारक म्हणून गुरु त्या दृष्टीने बिघडतो . जर शुक्र -राहू युती असल तर वैवाहिक सुख चांगले मिळत नाही . तसेच राहू मुळे अंतर जातीय किंवा आंतरधर्मीय जोडीदार असण्याची शक्यता असते . मंगल-राहू युती मध्ये मंगल भावंडांचा कारक ग्रह असल्याने त्या दृष्टीने काही वाईट फळे देण्याची शक्यता असते . 
एका व्यक्तीस भास होतात त्या व्यतिच्या पत्रिकेत सुद्धा राहुशी त्याचा संबंध आढळला . 

पत्रिकेतील बलवान राहू चांगली फळे पण देतो . अशावेळेस यश ,कीर्ती , आर्थिक उत्कर्ष चांगला होतो . राहू केतुला स्वत:च्याराशी नाहीत  परंतु राहू मिथुनेत व केतू धनु राशीत  उच्च मानतात .तसेच राहू केतुना दृष्टी आहे कि नाही या बाबतीत पण दोन मते आहेत एक म्हणजे त्यांना दृष्टी नसते आणि दुसरे म्हणजे राहुला ५,७,९,१२ तसेच केतुला फक्त सातवी दृष्टी असते . 

केतुला  सर्पाच्या शेपटीची उपमा दिली आहे . केतू हा मंत्र - तंत्र साधना ,कठोर तपश्चर्या , आयुर्वेदिक औषधांचा कारक ग्रह  आहे .  क़ेतुवरुन त्वचा विकार ,कोड ,मूळव्याध इ. गोष्टी बघतात . राहू प्रमाणे केतू देखील काही प्रमाणात ग्रहांना बिघडवतो . पण अध्यात्मिक प्रगतीच्या बाजूने जर पत्रिका असेल तर केतू त्यात मदतच करतो. गुरु- केतू युती त्या दृष्टीने चांगली  . चंद्र-  केतू युती असल तर थोडा नैराश्यवादी स्वभाव असण्याचा संबंध असतो . मंगळ - केतू युती कदाचित  काही रक्त  दोष उत्पन्न करणारी असू शकते . ( मंगळ हा रक्ताचा कारक ग्रह आहे ) .

कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये राहू - केतुना अतिशय महत्व आहे . कृष्णमुर्तीप्रमाणे ' Nodes are stronger than planets ' असे मानतात त्याचा बऱ्याच  वेळा अनुभव पण येतो . ह्या पद्धतीत राहू केतू संबंधी निर्णय देताना राहू वर ज्या ग्रहांची दृष्टी आहे ते फळ राहू / केतू देतील किंवा जर कोणाची दृष्टी नसेल तर ते ज्यांच्या युतीत आहेत त्याप्रमाणे फळे मिळतील . जर कोणाच्याही युतीत नसतील तर त्यांच्या नक्षत्र स्वामी प्रमाणे फळे मिळतील व जर ते स्वनक्षत्री  असतील तर ते ज्या राशीत आहेत त्या राशीस्वामी प्रमाणे फळे देतील  . 
आहे कि नाही फारच complex प्रकरण !

Monday 3 February 2014

पत्रिकेतील शनि

 शनि  ह्या ग्रहबाबत सर्वसामान्य पणे बऱ्याच लोकांच्या मनात भीती असते ती म्हणजे ' शनीची साडेसाती ' !
आयुष्यात जेव्हा केव्हा व्यक्तीला त्रास व्हायला लागतात तेव्हा मग शनि महाराजांची आठवण येते . मग बर्याच वेळा "साडेसाती सुरु आहे म्हणून हा त्रास होतोय "किंवा "बापरे आता पुढील वर्षीपासून साडेसाती सुरु "किंवा "मग संपली बुवा एकदाची साडेसाती "असे ऐकायला मिळते . तर सगळ्यात आधी साडेसाती म्हणजे काय ते  पाहू .


जेव्हा गोचर शनि जन्मकुंडलीतील चंद्राच्या व्ययात , चंद्रावरून व चंद्राच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करतो त्यावेळेस साडेसाती आहे असे म्हणतात . ( शनि एका एकाराशीत अडीच वर्षे असतो त्यामुळे एकूण २. ५ +२. ५+२. ५=७. ५ )
उदा . जर एखादा माणूस तूळ राशीचा आहे तर जेव्हा गोचर ( transit ) शनि कन्येत जाईल तिथपासून ह्या माणसास साडेसाती सुरु झाली असे म्हणतात . गोचर शनि कन्या , तूळ , वृश्चिक ह्या राशीतून जाईल तो पर्यंत तूळ राशीला साडेसाती आहे असे म्हणतात एकदा का शनि धनु राशीत गेला कि तुळेची साडेसाती संपली . मग वृश्चिक राशीच्या माणसास साडेसाती सुरु .

साडेसाती मध्ये वाईटच होते असे काही नाही . बर्याच वेळा साडेसाती मध्ये जबादारी वाढते  अर्थात चांगल्या अर्थाने म्हणजे लग्न होणे मुल होणे इ. पण साडेसातीच्या साडेसात वर्षांमध्ये होणार्या वाईट घटनांचा सबंध फक्त शनीची अवकृपा  म्हणून लावला जातो  .साडेसाती म्हणजे शनीचे audit ! तुम्ही केलेल्या चांगल्या व वाईट कर्मांचा तुमच्यावर होणारा परिणाम . नुसती साडेसाती आहे म्हणून त्रास होईल असे नाही तर  समजा दशा ,गोचर ग्रह हे पण जर विरोधात असतील तर साडेसातीचा त्रास होतो . तसेच तुमच्या पत्रिकेत जर तुमच्या राशीत ( म्हणजे चंद्र रास ) , चंद्राच्या मागच्या किंवा पुढच्या स्थानात जास्त ग्रह असतील किंवा साडेसाती दरम्यानदशनीची दृष्टी ज्या स्थानावर पडणार आहे तिथे खूप ग्रह असतील तर साडेसाती मध्ये शनि तेवढ्या ग्रह वरून भ्रमण करेल व त्या स्थानावर दृष्टी टाकेल व त्रास कदाचित जास्त होईल . उदा : जर तूळ रास आहेत जन्मपत्रिके मध्ये जास्त ग्रह तुळेत ,कन्येत किंवा वृश्चिकेत असतील तर साडेसातीचा त्रास कदाचित जास्त होईल ( परत दशा बाकी गोचर हे बघावे लागेलच ) .

 साडेसाती व्यतिरिक्त आता शनि बद्दल अजून माहिती घेऊ.

शनि म्हणजे विलम्ब ,त्याग ,वैराग्य , वृद्धत्व,नैराश्य ,राजकारण  .शनि हा नैसर्गिक पापग्रह मनाला आहे . 
शनीच्या  स्वत:च्या राशी मकर व कुंभ आहेत . शनि तूळ राशीत उच्चीचा व मेष  राशीत नीचीचा मानतात . शनीचे रत्न नीलम आहे . शनि गोर गरीबांचा , कामगार  वर्गातील  लोकांचा ,दिन दुबळ्याचा कारक ग्रह आहे .शनि हा काटकसरी वृत्तीचा,गंभीर ग्रह आहे . शनि कोणतीही गोष्ट  विलंबाने घडवतो . प्रश्न कुंडली मध्ये रुलिंग मध्ये शनि  आल्यास घटना उशिरा घडते.जन्मपत्रिकेत पंचमातील शनि संतती होण्यास विलंब लावण्याची शक्यता असते. तसेच जन्मपत्रिकेत सप्तमातील  शनि विवाह होण्यास विलंब लावण्याची शक्यता असते.

शनि हा लोंकाचा support दाखवतो . एखादी व्यक्ती लोकप्रिय होण्यामागे शनि कारणीभूत असतो . प्रसिद्ध व लोकप्रिय व्यक्तींच्या पत्रिकेत शनि चांगला असतो . तसेच न्यायदानाच्या कामात पण शनीचे महत्व आहे त्यामुळे वकील , न्यायाधीश ह्यांच्या पत्रिकेतील शनि पण चांगला असावा लागतो . 

शनि हा हाडांचा कारक ग्रह आहे . थंडीमुळे होणारे आजार तसेच दीर्घ मुदतीचे आजार शनि च्या अमलाखाली येतात . व्यंग ,कफ ,महारोग ,दमा, पायाचे विकार , दातांचे आजार.,अपंगत्व  इ. विचार शनीवरून करतात . 

'भोग भोगा आणि मुक्त व्हा ! ' हा संदेश शनि देतो .