Title

Astrology Blog by Anagha Bhade


Friday 21 November 2014

आजार आणि पत्रिका

Prevention is better than cure !

आजारी  पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी . काळजी घ्यायची म्हणजे नेमके काय करायचे तर योग्य व्यायाम , आहार आणि सगळ्यात महत्वाचे आनंदी मन जपायचे . आता तुम्ही म्हणाल ह्यात काय नवीन सांगते आहे हे सगळ्यांनाच माहित आहे पण बहुतेक कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे .

ह्या सगळ्यामध्ये पत्रिका आपल्याला काही मार्गदर्शन करू शकते का ? तर हो ! आपल्याला संभाव्य आजारांचा पत्रिकेतून अंदाज येऊ शकतो . उदा. समज डायबेटीस होईल अशी शक्यता वाटत असेल तर योग्य व्यायाम व आहार ठेवून आपण काही काळ हा आजार लांबणीवर  टाकू शकतो व  अगदी झालाच तर आधीच कल्पना असल्याने योग्य ती काळजी घेऊन कंट्रोल मध्ये ठेवू शकतो .

शरीरातील कोणत्या अवयवांची काळजी घेतली पाहिजे  ह्याचा पत्रिकेतून अंदाज येऊ शकतो उदा . पोट , पाठ इ.
समजा हृदयाशी सबंधित काही दुखणे उद्भवण्याची काही शक्याता असेल तर दरवर्षी आपले रक्त तपासून त्यातील cholesterol, triglyceride इ. योग्य प्रमाणात  आहे ना ह्याची पण खात्री करून घेतली पाहिजे जेणेकरून झालेला बदल लगेच लक्षात येईल व त्याप्रमाणे उपचार करून घेता येईल किंवा पथ्य पाळता येईल .

मी जे वारंवार सांगत असते कि पत्रिकेचा उपयोग मार्गदर्शक म्हणून नक्कीच होतो . परंतु केवळ पत्रिका संभाव्य धोके दाखवू शकते . त्यामुळे त्यातून धडा घेऊन कसे वागायचे हे  ज्याने त्यानेच ठरवले पाहिजे . आता काही जणांना वाटते कि  पत्रिका बघितली कि झाले मग एखादा आजार आपल्याला होणार नाही असे कळले कि मग चिंता मिटली तर असे नसते आजाराचे इतके प्रकार आहेत जे दर वेळेस medical science साठी सुद्धा नवीन असतात . आपण पत्रिकेतून फक्त आपल्याला होऊ शकणाऱ्या आजाराच्या शक्यता पडताळून पाहत असतो जेणे करून त्यातल्या त्यात काळजी घेऊ शकतो . उदा . काही जणांना पोटाचे विकार होण्याची शक्यता असता त्याने आहारावर  विशेष लक्ष देणे आवश्यक आहे काही जणांच्या बाबतीत पाठीचे  होण्याची शक्यता असल्यास बर्याच वेळ एका जागीजागी  बसून काम करणे टाळणे , योग्य व्यायाम करणे इ. गोष्टी केल्या पाहिजेत .

पत्रिकेतून आजाराची शक्यता  कशी बघायची ? तर ह्यासाठी आधी प्रत्येक ग्रहावरून तसेच पत्रिकेतील प्रत्येक भावावरून कोणत्या प्रकारचे अवयव तसेच आजार होऊ शकतात ह्याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे . त्या नंतर
पत्रिकेतील  प्रथम भाव ( एकंदर आरोग्य ) , पंचम भाव( आजारातून बाहेर येण्यासाठी पंचम भाव कार्यरत असणे आवश्यक आहे )  , षष्ठ भाव ( आजार पण ) , अष्टम भाव ( सर्व प्रकारचे त्रास ) तसेच द्वादश भाव ( hospitalization ) हे सर्व भाव अभ्यासण्याची गरज असते . आता ह्या सर्व भावांचा व त्याच्याशी सबंधित ग्रहांचा एकत्रित पणे विचार करून मग काही निष्कर्ष काढता येतात . एकदा आपल्याला आपल्या पत्रिकेतील काळजी घेण्यासारखे अवयव शोधले कि त्या दृष्टीने काळजी घेता  येते . आता एखादे आजारपण होईल असे वाटल्यास साधारण त्याचा कालखंड महादशा तसेच अंतर्दशा व गोचर भ्रमण म्हणजे transits ह्यावरून ठरवता येते .साधारणपणे १,६,८,१२ ह्या भावांच्या एकत्रित दशा  सुरु असल्यास आजारपण येऊ शकते . तसेच पंचम व लाभ स्थान कार्यान्वयित(active ) असेल तर आजारातून बरे होण्यास सुरुवात होते . एखाद्या वेळी सर्जरी (operation ) ची शक्यता पण मंगळाचा सबंध असल्यास पडताळून बघता येते .

ह्यावरून तुम्हाला समजले असेल कि ज्योतिषशास्त्राचा योग्य उपयोग  हा काळजी वाढवण्यासाठी नसून काळजी घेण्यासाठी आहे .