Title

Astrology Blog by Anagha Bhade


Friday, 21 November 2014

आजार आणि पत्रिका

Prevention is better than cure !

आजारी  पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी . काळजी घ्यायची म्हणजे नेमके काय करायचे तर योग्य व्यायाम , आहार आणि सगळ्यात महत्वाचे आनंदी मन जपायचे . आता तुम्ही म्हणाल ह्यात काय नवीन सांगते आहे हे सगळ्यांनाच माहित आहे पण बहुतेक कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे .

ह्या सगळ्यामध्ये पत्रिका आपल्याला काही मार्गदर्शन करू शकते का ? तर हो ! आपल्याला संभाव्य आजारांचा पत्रिकेतून अंदाज येऊ शकतो . उदा. समज डायबेटीस होईल अशी शक्यता वाटत असेल तर योग्य व्यायाम व आहार ठेवून आपण काही काळ हा आजार लांबणीवर  टाकू शकतो व  अगदी झालाच तर आधीच कल्पना असल्याने योग्य ती काळजी घेऊन कंट्रोल मध्ये ठेवू शकतो .

शरीरातील कोणत्या अवयवांची काळजी घेतली पाहिजे  ह्याचा पत्रिकेतून अंदाज येऊ शकतो उदा . पोट , पाठ इ.
समजा हृदयाशी सबंधित काही दुखणे उद्भवण्याची काही शक्याता असेल तर दरवर्षी आपले रक्त तपासून त्यातील cholesterol, triglyceride इ. योग्य प्रमाणात  आहे ना ह्याची पण खात्री करून घेतली पाहिजे जेणेकरून झालेला बदल लगेच लक्षात येईल व त्याप्रमाणे उपचार करून घेता येईल किंवा पथ्य पाळता येईल .

मी जे वारंवार सांगत असते कि पत्रिकेचा उपयोग मार्गदर्शक म्हणून नक्कीच होतो . परंतु केवळ पत्रिका संभाव्य धोके दाखवू शकते . त्यामुळे त्यातून धडा घेऊन कसे वागायचे हे  ज्याने त्यानेच ठरवले पाहिजे . आता काही जणांना वाटते कि  पत्रिका बघितली कि झाले मग एखादा आजार आपल्याला होणार नाही असे कळले कि मग चिंता मिटली तर असे नसते आजाराचे इतके प्रकार आहेत जे दर वेळेस medical science साठी सुद्धा नवीन असतात . आपण पत्रिकेतून फक्त आपल्याला होऊ शकणाऱ्या आजाराच्या शक्यता पडताळून पाहत असतो जेणे करून त्यातल्या त्यात काळजी घेऊ शकतो . उदा . काही जणांना पोटाचे विकार होण्याची शक्यता असता त्याने आहारावर  विशेष लक्ष देणे आवश्यक आहे काही जणांच्या बाबतीत पाठीचे  होण्याची शक्यता असल्यास बर्याच वेळ एका जागीजागी  बसून काम करणे टाळणे , योग्य व्यायाम करणे इ. गोष्टी केल्या पाहिजेत .

पत्रिकेतून आजाराची शक्यता  कशी बघायची ? तर ह्यासाठी आधी प्रत्येक ग्रहावरून तसेच पत्रिकेतील प्रत्येक भावावरून कोणत्या प्रकारचे अवयव तसेच आजार होऊ शकतात ह्याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे . त्या नंतर
पत्रिकेतील  प्रथम भाव ( एकंदर आरोग्य ) , पंचम भाव( आजारातून बाहेर येण्यासाठी पंचम भाव कार्यरत असणे आवश्यक आहे )  , षष्ठ भाव ( आजार पण ) , अष्टम भाव ( सर्व प्रकारचे त्रास ) तसेच द्वादश भाव ( hospitalization ) हे सर्व भाव अभ्यासण्याची गरज असते . आता ह्या सर्व भावांचा व त्याच्याशी सबंधित ग्रहांचा एकत्रित पणे विचार करून मग काही निष्कर्ष काढता येतात . एकदा आपल्याला आपल्या पत्रिकेतील काळजी घेण्यासारखे अवयव शोधले कि त्या दृष्टीने काळजी घेता  येते . आता एखादे आजारपण होईल असे वाटल्यास साधारण त्याचा कालखंड महादशा तसेच अंतर्दशा व गोचर भ्रमण म्हणजे transits ह्यावरून ठरवता येते .साधारणपणे १,६,८,१२ ह्या भावांच्या एकत्रित दशा  सुरु असल्यास आजारपण येऊ शकते . तसेच पंचम व लाभ स्थान कार्यान्वयित(active ) असेल तर आजारातून बरे होण्यास सुरुवात होते . एखाद्या वेळी सर्जरी (operation ) ची शक्यता पण मंगळाचा सबंध असल्यास पडताळून बघता येते .

ह्यावरून तुम्हाला समजले असेल कि ज्योतिषशास्त्राचा योग्य उपयोग  हा काळजी वाढवण्यासाठी नसून काळजी घेण्यासाठी आहे . 

Thursday, 11 September 2014

शिक्षण आणि पत्रिका भाग -३

मागील लेखात आपण रवि , चंद्र , मंगळ ह्या ग्रहांशी सबंधित शिक्षण क्षेत्रातील माहिती घेतली ह्या लेखात पुढील ग्रहांबद्दल माहिती बघुयात .
मागील लेखात म्हंटल्या प्रमाणे शिक्षण शाखा ठरवताना चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी महत्वाचा ठरतो . 

जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी शुक्र असेल किंवा शुक्राच्या नक्षत्रात असेल तर साधारण पण शुक्राशी सबंधित शिक्षण  घेतले जाते . शुक्रावरून कला म्हणजे गायन , नृत्य ,चित्रकला , भरतकाम , शिवण कला ह्याचाविचार केला जातो    . तसेच वाहन ( गाड्या) , खाण्याचे पदार्थ , आर्किटेक्ट , सौदर्य प्रसाधने ,fashion designing ह्या  क्षेत्रांचा पण विचार होतो . 
शुक्राबरोबर अजून कोणते ग्रह आहेत त्या नुसार क्षेत्रे ठरत असतात . उदा . शुक्र बरोबर जर बुध , चंद्र असतील व ३,५,७ ह्या भवांशी सबंध असेल तर textile designing ,शुक्र बरोबर जर बुध , राहू असतील व ५,३,८ ह्या भवांशी सबंध असेल तर फोटोग्राफी असे वर्गीकरण करता येते . 

जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी बुध  असेल किंवा बुधाच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे बुधाशी सबंधित शिक्षण  घेतले जाते. बुधावरून गणित , तत्वज्ञान , भाषा , टूरिझम  , पत्रकारिता , ज्योतिष , प्रकाशन , लेखन इ. क्षेत्रांचा अभ्यास  केला जातो . बुधामुळे एका पेक्षा जास्त शाखेत प्राविण्य मिळण्याची पण शक्यता असते . 
बुधाबरोबर अजून कोणते ग्रह आहेत त्या नुसार क्षेत्रे ठरत असतात . उदा . बुधा  बरोबर गुरु असेल व ३, ९ ह्या भावांशी सबंध असेल तर जाहिरात क्षेत्र , बुधा  बरोबर शुक्र असेल व ३,१०,११ ह्या भावांशी सबंध असेल तर मार्केटिंग व सेल्स ,
बुधा  बरोबर गुरु असेल व ४,९,११ ह्या भावांशी सबंध असेल तर शिक्षण  क्षेत्र , बुधा  बरोबर गुरु असेल व ३, ११,१२  ह्या भावांशी सबंध असेल तर परदेशी भाषा ह्या प्रमाणे अंदाज बांधता येतात . 

जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी गुरु  असेल किंवा गुरूच्या  नक्षत्रात असेल तर साधारण पणे गुरूशी  सबंधित शिक्षण  घेतले जाते . 
गुरूवरून कॉमर्स , बॅंकिंग , शिक्षणक्षेत्र ,धर्मशास्त्र , राजकारण , वेद व मंत्र शास्त्र इ. क्षेत्रांचा विचार होतो . गुरु बरोबर अजून कोणते ग्रह आहेत त्या नुसार क्षेत्रे ठरत असतात . उदा . गुरु  बरोबर रवि व मंगळ असेल आणि ६,१०,११ ह्या भावांचा सबंध असेल तर राजकारण ,गुरु बरोबर बुध ,शुक्र असून २,३,७,९ ह्या भावांशी सबंध असेल तर सी . ए  ( वाणिज्य शास्त्र ) , गुरु बरोबर शनि ,बुध असून ३,९,११,४ ह्या भावांशी संबंध असेल तर कॉम्पुटर सोफ्टवेअर इ. क्षेत्रांचा विचार  करता येतो . 

जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी शनि असेल किंवा शनिच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे शनीशी सबंधित शिक्षण  घेतले जाते .शनि वरून archaeology , engineering , ज्योतिष , तत्वज्ञान इ. गोष्टींचा अभ्यास केला जातो . शनी कोणत्या ग्रहाबरोबर आहे तसेच कोणत्या स्थानाशी सबंधित आहे त्यावरून अजून जास्त माहिती मिळू शकते . उदा . शनी , बुध , मंगळ  व १, ८ हे भाव mechanical engg  सुचवतात , शनी बरोबर शुक्र , मंगळ असल्यास व २,१,५,८ ह्या भावांशी सबंध असल्यास  dentist हे क्षेत्र सुचवते . 


जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी राहू किंवा केतू असेल किंवा राहू , केतूच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे राहू ,केतू ज्या राशीत आहेत त्या राशीच्या राशीच्या अधिपातीप्रमाणे  तसेच राहू केतू ज्यांच्या युतीत आहे व ज्या ग्रहांची दृष्टी त्यांच्यावर आहे त्या ग्रहांप्रमाणे त्याचे मूल्यमापन करावे . 

एकंदर शिक्षणाचा विचार पत्रिकेवरून करताना ४, ९,११  महत्वाची आहेत तसेच चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघितला जातो. त्याचा  ग्रहांशी तसेच स्थानाशी येणारा सबंध तसेच पुढे येणाऱ्या महादशा ह्या सर्व गोष्टींचा तारतम्याने विचार करावा लागतो.
एक दिशा सापडण्यासाठी नक्कीच पत्रिकेचा उपयोग होऊ शकतो परंतु ज्योतिष हे एक तर्क शास्त्र आहे ह्याचे भान मात्र सदैव ठेवायला हवे .



Thursday, 21 August 2014

शिक्षण आणि पत्रिका - भाग २

मागील लेखात आपण शिक्षण आणि पत्रिका ह्याबाबतीतला आढावा घेतला .  ह्या लेखात ग्रह आणि भाव साधारण कोणती शिक्षण शाखा सुचवतात हे पाहू.

कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शिक्षणाकरता लक्षात घ्यावा लागतो .

हा उपनक्षत्र स्वामी जर बुध किंवा गुरु शी सबंधित( बुध , गुरु असेल किंवा बुध - गुरु च्या नक्षत्रात असेल ) असेल तर शिक्षण चांगले होते . तसेच चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी ४, ९,११ ह्या भावांचा कार्येश असेल तर शिक्षण व्यवस्थित पूर्ण होते . अर्थात त्या काळात येणाऱ्या दशा सुद्धा ४,९, ११ हि स्थाने देणाऱ्या हव्यात त्या जर उलट्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या ३,८ स्थानाच्या असतील तर शिक्षणात अडचणी येतात . अडचणी येतात म्हणजे खूप मेहनत करावी लागते सहज यश मिळत नाही . 
आता चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे व तो कोणत्या ग्रहाच्या नक्षत्रात आहे  ते बघावे तसेच 
कोणकोणत्या भावांचा कार्येश आहे ते बघून मग साधारणपणे शिक्षण शाखा ठरवू शकतो . तसेच आयुष्यात पुढे येणाऱ्या महादशा कोणते क्षेत्र सुचवते आहे ह्याचा  सारासार विचार करून मग ठरवावे . 

जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी रवि असेल किंवा रवीच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे रवि ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते . उदा . वैद्यकशास्त्र ( medical field )  , administration , politics , astronomy इ. 
उदा . आता समजा चतुर्थ स्थानाचा उ. न स्वामी रवि व मंगळ ह्यांच्याशी सबंधित  असून १, ८, ५,१२ ह्या भावांचा कार्येश असेल    
व मेष , वृश्चिक , सिंह , मीन ह्या राशीचा प्रभाव असेल ( म्हणजे ह्या राशीत प्रामुख्याने ग्रह असतील ) ,तसेच पत्रिकेचा शैक्षणिक दर्जा पण चांगला असेल तर मग ' सर्जन' होण्यासाठी ती पत्रिका SUPPORTING आहे असे म्हणता येईल . 
एकदा जर वैद्यक शाखा निश्चित केली तर मग ग्रह , राशी भाव ह्याप्रमाणे मग आयुर्वेद , homeopathy , allopathy ह्या शाखा ठरवता येतात तसेच समजा allopathy नक्की झाले तर मग पुढील शिक्षण कोणते क्षेत्र दाखवते हे पण बघता येते . उदा . जर शुक्र, रवि,चंद्र , मंगळ हे ग्रह वृषभ ,मीन , वृश्चिक , मेष ह्या राशी व २, १२,८,१ हे भाव असतील तर मग डोळ्यांचे डॉक्टर (आय सर्जन ) होता येईल .

जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी चंद्र असेल किंवा चंद्राच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे चंद्र  ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते . उदा . चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे तसेच जलपदार्थ , ताज्या भाज्या , वाहतूक , पाककला इ. गोष्टी चंद्रावरून बघतात त्यामुळे मानसशास्त्र ,  नेव्ही , शेती,नर्सिंग , सुगंधी द्रव्ये इ. क्षेत्र  चंद्राच्या अधिपत्याखाली येतात . त्यामुळे Agriculture and food engg , dairy technology , pscyhology , bio- chemical , लहान  मुलांचे शिक्षण क्षेत्र इ. गोष्टींसाठी चंद्र अनुकूल असतो . 
आता प्रत्येक क्षेत्र हे कोण्या एका ग्रहामुळेच ठरत नसून हे ग्रह , राशी भाव ह्यांचे combination बघावे लागते . 
उदा .psycology मध्ये चंद्र , बुध , गुरु हे ग्रह कर्क, मीन , मेष , मिथुन ह्या राशी आणि ४,३,१२ हे भाव ह्या सगळ्या गोष्टीं असाव्या लागतात . 

जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी मंगळ असेल किंवा मंगळाच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे मंगळ  ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते .
उदा. energy , power ,electricity , fire , जमीन etc . 
त्यामुळे प्रामुख्याने अभियांत्रिकी ( enggineering ) , मिलिटरी , बांधकाम , रवि पण असेल तर मग सर्जरी , पोलिस खाते इ. क्षेत्रासाठी अनुकूल असातो . 
एक उदाहरण द्यायचे झाल्यास electrical engineering करता मंगळा बरोबर बुधाचा विचार होतो तसेच मेष ,सिंह ,वृश्चिक ह्या राशी व ३, ८, ११ हे भाव महत्वाचे असतात . 

वर म्हटल्याप्रमाणे केवळ एक ग्रह ठराविक शाखेकरता कारणीभूत नसतो तर ग्रह ,राशी ,भाव ह्यांचे combination बघावे लागते व पुढे येणाऱ्या दशा ह्या सगळ्यांचा समग्र विचार करून मग दिशा ठरवता येते .

बाकी ग्रहांबद्दलची माहिती पुढील भागात बघुयात .


Monday, 28 July 2014

शिक्षण आणि पत्रिका भाग -१

आजकाल शिक्षण हा विषय फारच महत्वाचा झाला आहे . चांगल्या करियर करता चांगले शिक्षण आवश्यक आहे हे आता सर्वमान्यच आहे . त्यामुळे पालक सुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत खूपच जागरूक असतात . आता वाढती competition आणि अवाढव्य फिया ह्यामधून योग्य त्या शिक्षणाची शाखा निवडणे म्हणजे फारच अवघड होऊन बसले आहे . पुन्हा काही मोजकी मुले सोडली तर बहुतांशी मुले स्वत:ला काय आवडतंय किंवा कोणत्या विषयात गती आहे . पुढे जाऊन काय करायचं आहे ह्याविषयी गोंधळलेली असतात . अशात आई वडील म्हणतात म्हणून एखाद्या  शाखेला प्रवेश मिळावा म्हणून धडपडत असतात .  ह्या सर्व गोष्टींचा ताण मुलांवर असतो आई वडील सुद्धा मुलाच्या करियरच तेवढेच टेन्शन घेतात . अशा परिस्थिती मध्ये पत्रिकेतून काही मार्गदर्शन मिळू शकते का ?तर हो !
पत्रिकेवरून मुळात मुलाची बुद्धिमत्ता , कल /आवड , कोणते क्षेत्र मुलाकरता ( इथे 'मुलाकरता ' हा शब्द मुले म्हणजे kids मुलगा / मुलगी ह्या दृष्टीने  वापरला आहे . नुसते मुलगे असे नव्हे ) चांगले आहे , कोणते शिक्षण घेतल्यास फायदा होईल , करियर च्या दृष्टीने पुढे येणारा काळ कोणत्या क्षेत्रात काम करण्यास जास्त supporting आहे ह्या गोष्टींचा अंदाज येतो . तसेच जर एखादे वेळेस २-३ options मध्ये कोणती side निवडावी ह्याबाबतीत गोंधळ होत असेल तर पत्रिकेतून जास्त suitable option निवडण्यास मदत होऊ शकते .
आता पत्रिकेतून शिक्षणासंबंधी विचार कसा करायचा ते बघू .
ह्याबाबतीत मला कृष्णमुर्ती पद्धत जास्त प्रभावी वाटते . कृष्णमुर्ती पद्धती नुसार चतुर्थ स्थान,नवम स्थान व लाभ स्थान  हे शिक्षणाच्या दृष्टीने बघितले जाते . चतुर्थ स्थानावरून साधारण पणे graduation पर्यंत च्या शिक्षणाचा विचार केला जातो नवम स्थानावरून उच्च शिक्षणाचा विचार होतो व लाभ स्थान हे सर्व प्रकारच्या लाभा करता विचारात घेतले जाते त्यामुळे शिक्षणाचा विचार करताना ४,९,११ हि महत्वाची स्थाने होत . तसेच ३,८ हि स्थाने शिक्षणाला विरोध करणारी किंवा अडथळे आणणारी आहेत .त्यामुळे साहजिकच ४,९,११  हि स्थाने कार्यान्वयित असणाऱ्या दशा शिक्षणाला पोषक व ३, ८ च्या दशा त्यामानाने अडचणी उत्पन्न करणाऱ्या असतात .
चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शिक्षणाच्या दृष्टीने विचारात घ्यावा लागतो . प्रथम पत्रिका बघताना शिक्षणाचा प्रश्न असेल तर चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघावा तो रुलिंग  मध्ये आहे का ते पाहावे . जर रुलिंग मध्ये असेल तर जन्मवेळ बरोबर आहे जर नसेल तर त्या उपनक्षत्र स्वामी च्या जवळचा ग्रह जो रुलिंग मध्ये आहे तो उ. न स्वामी म्हणून समजून त्याप्रमाणे जन्मवेळ शुद्ध करून घ्यावी . अशाप्रकारे जर २-४ मिनिटांचा जन्म वेळेत फरक असेल तर तो error काढता येतो . 
आता एकदा चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी ठरला कि मग तो  ग्रह कोणता आहे ? कोणाच्या नक्षत्रात आहे ? कोणकोणत्या भावांचा कार्येश आहे . तसेच पुढे येणाऱ्या दशा कोणत्या दिशेच्या / क्षेत्राच्या दृष्टीने जास्त supporting आहेत हे बघून मग  एक दिशा मिळू शकते . 
प्रत्येक ग्रहानुसार आणि पत्रिकेतील भावानुसार क्षेत्र ठरतात .  त्यामुळे  सर्वांचा तारतम्याने  विचार करून तसेच  मग ठरवता येते . आता कोणते ग्रह , भाव  कोणती क्षेत्रे दाखवतात  त्याचा विचार पुढच्या भागात करू . 


Friday, 27 June 2014

गुरु बदल - भाग २ ( Jupiter Transit 2014 )

गुरु  कर्क राशीत १८ जून १२०१४ पासून १३ जुलै २०१५ पर्यंत आहे .

सध्याच्या कर्क राशीतील गुरु ग्रहाच्या भ्रमणाचा प्रत्येक राशीनुसार होणार्या परिणामाचा ढोबळ अंदाज : 
( अर्थातच ह्या अंदाजात प्रत्येकाच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती तसेच दशा ह्यांचा विचार  नसल्याने  ' ढोबळ ' अंदाज असे म्हंटले आहे ) 


मेष रास : 
सध्या मेष  राशीला चौथा गुरु आहे. गृहसौख्य चांगले राहील . विद्यार्थ्यांना पण चतुर्थ स्थानातील गुरु शिक्षणाच्या दृष्टीने चांगलाच असतो . गृह खरेदी , वाहन खरेदी या करता पण अनुकूल . इथल्या गुरूची दृष्टी जरी दशमावर येत असली तर प्रमोशन वगेरे साठी  हा गुरु तितकासा उपयोगी नाही  . 


वृषभ रास : 
सध्या वृषभ राशीला तिसरा गुरु आहे . तृतीय स्थान   आहे , त्यामुळे छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे . तृतीय स्थानावरून लेखन ,  प्रकाशन , media इ. विचार केला जातो . त्यामुळे ह्या क्षेत्रातील लोकांसाठी काही नवीन संधी घेऊन येईल . सप्तमावर व लाभ स्थानावर तृतीयातील गुरूची दृष्टी असेल . 

मिथुन  रास : 
सध्या मिथुन  राशीला दुसरा गुरु आहे . द्वितीय स्थानावरून आर्थिक प्रगती (द्वितीय  हे २,६,१० ह्या अर्थ त्रिकोणातील स्थान आहे  )  , कुटुंबवृद्धी इ. गोष्टी बघितल्या जातात इथला गुरु ह्या गोष्टी वृद्धिंगत करणारा ग्रह आहे त्यामुळे आर्थिक मान वाढेल . कटुंब वृद्धी म्हणजे संतती साठी प्रयंत्न करणाऱ्या लोकांना संतती प्राप्ती तसेच लग्नाळू लोकांचे विवाह होणे.इ. गोष्टी शक्य आहेत .नोकरी / व्यवसायाच्या दृष्टीने काही संधी उपलब्ध करून देईल . 

कर्क रास : 
सध्या कर्क राशीला पहिला गुरु आहे . प्रथम स्थानावरून म्हणजे चंद्र राशीप्रमाणे चंद्रावरून गुरुचे भ्रमण होत आहे . चंद्र हा मनाचा कारक  ग्रह आहे . प्रथम स्थानातील गुरु आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने फारसा उपयुक्त नसला तरी गुरुसारखा शुभ ग्रह नक्कीच मन प्रसन्न ठेवेल  positive energy निर्माण करेल . तसेच गुरूची दृष्टी पंचम ,सप्तम  व नवम स्थानावरून बघितल्या जाणार्या गोष्टीचे शुभ परिणाम दिसतील . 

सिंह रास : 
सध्या सिंह राशीला बारावा गुरु आहे .व्यय स्थानातील गुरु अध्यात्मिक प्रगतीसाठी  चांगला असतो . बारावे स्थान हे मोक्ष त्रिकोणातील (म्हणजे ४,८,१२ ) महत्वाचे महत्वाचे स्थान आहे . हा गुरु आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने प्रभावी  नसला तरी
नियोजन ( planning ) च्या दृष्टीने उपयुक्त असतो .बारावे स्थान हे परदेश गमनासाठीचे (Long distance journey ) साठी महत्वाचे स्थान आहे . त्यामुळे प्रवास पण शक्य आहे . 

कन्या रास : 
सध्या कन्या  राशीला अकरावा  गुरु आहे . अकराव्या स्थानातील  सगळे ग्रह हे लाभदायक असतात . इथे कन्या राशीला गुरु हा तृतीयेश व सप्तमेश आहे त्यामुळे भावंडाकडून किंवा जोडीदाराकडून फायदा . सप्तमावरून business partner चा पण विचार होतो त्यामुळे भागीदारीत फायदा असेही logic लावता येईल . तसेच लाभ स्थान हे सर्व प्रकारच्या लाभाकरता विचारात घेतले जाते त्यामुळे विवाह , संतती , नोकरी , घर खरेदी  इ. सर्व  गोष्टी मध्ये गुरु मुळे सहाय्याच होईल .कन्या राशील तर जेव्हा शनि वृश्चिकेत जाईल  तेव्हा तृतीय शनि आणि अकरावा गुरु म्हणजे तर 'बहुत अच्छे दिन ! ' 

तूळ रास : 
सध्या तूळ राशीला दहावा गुरु आहे .दशमातील गुरु हा नोकरी / व्यवसायाच्या दृष्टीने प्रगतीकारक असतो परंतु कधीकधी बर्याच अवघड परिस्थिती निर्माण करतो . यश मिळणे अवघड असले तरी प्रगतीकाराकच असतो . ह्या काळात patience ची गरज असते . दशमातील ग्रह सर्वसाधारण पणे कामाचा ताण वाढवतात. २, ६ , १० ह्या अर्थ त्रिकोणातील गुरुची आर्थिकबाजू चांगली बाजू राहण्याच्या  दृष्टीने शुभ फ़लेच  मिळतात . 

 वृश्चिक रास : 
सध्या वृश्चिक राशीला नववा  गुरु आहे . मागील वर्षभर आठवा गुरु असल्याने बर्याच कामांमध्ये अडचणी  येत असतील तर  आता पासून नवव्या गुरु मुळे त्या दूर होतील तसेच नवीन संधी पण मिळू शकतील .  नवम स्थानातील गुरूमुळे धार्मिकस्थळांना भेट देण्याचा योग येऊ शकतो .  तसेच नवामातील गुरु तृतीय स्थानाला बघत असल्याने व ३, ९ हि 
प्रवासाची स्थाने आहेतच त्यामुळे प्रवास होतील . नवमातील गुरु पंचम स्थानाला व प्रथमस्थानाला पण बघतो  
त्यामुळे मुलांच्या दृष्टीने पण चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे . 

धनु रास : 
सध्या धनु राशीला आठवा  गुरु आहे .सर्वसाधारण पण अष्टमातील ग्रह हे अडथळे उत्पन्न करणारे , मनस्ताप देणारे असतात . गुरु हा मुळात शुभ ग्रह असल्याने  मनस्ताप होईलच  असे नाही परंतु साधारण पणे  'जैसे थे '  परिस्थिती ठेवणारा हा गुरु आहे . 

मकर रास : 
सध्या मकर राशीला सातवा गुरु आहे .सप्तमातील गुरु हा वैवाहिक सुखास चांगला ! लग्नाळू मुला/ मुलांची लग्न ठरण्याच्या दृष्टीने पोषक . तसेच सप्तमातील गुरूची दृष्टी तृतीय व लाभ स्थानावर असल्याने छोटे प्रवास पण आनंददायी 
ठरू शकतात . तसेच सप्तमावरून भागीदारांचा विचार  करत असल्याने चांगले भागीदार मिळू शकतात . सप्तमातील गुरु  लोकसंग्रह / ओळखी वाढवणारा आहे . 

कुंभ रास :
सध्या कुंभ राशीला  सहावा गुरु आहे .षष्ठ स्थान हे विरोधकांचे तसेच आजारांचे स्थान आहे गुरु कोणतीही गोष्ट वाढवतो त्यामुळे ह्या स्थानातील गुरु आजारपणे आणि आणि विरोधक वाढवणार . अर्थातच आता लगेच माझी कुंभ रास आहे आणि षष्ठात गुरु म्हणजे आजारी पडणार असे नव्हे तर जर दशा पण आजारपणाच्या असतील तरच त्याचा प्रभाव दिसून येईल . षष्ठ स्थान हे अर्थ त्रिकोणातील स्थान आहे त्यामुळे आर्थिक प्रगती  पण होईल . 

 मीन रास :
सध्या मीन राशीला पाचवा  गुरु आहे .चंद्राच्या पंचमातील गुरुची चंद्रावर पूर्ण दृष्टी असते . पंचमातील गुरु भ्रमण हे शुभ मानले आहे .  पंचम स्थान हे संततीे   स्थान आहे त्यामुळे मुलांच्या ( kids ) दृष्टीने प्रयत्न करणार्यांना हे वर्ष अपत्य प्राप्तीच्या दृष्टीने चांगले आहे . तसेच मुले असणाऱ्या लोकांना पण मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने शुभ . पंचम स्थानाशी सबंधित व्यवसाय / नोकरी असणाऱ्या म्हणजे कला , क्रीडा इ. क्षेत्रातील लोकांना पण चांगले जाईल . 

सर्वसाधारण पणे  ग्रहाचा स्वभाव व तो ज्या स्थानात येत आहे त्या स्थानावरून बघितल्या जाणाऱ्या गोष्टींची सांगड घालून हे लिहिले आहे तुम्ही सुद्धा असे लॉजिक लावून अजून conclusions काढू शकाल . 
आधी लिहिले त्याप्रमाणे हा फक्त ढोबळ अंदाज आहे कारण अर्थातच प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असते त्याप्रमाणे ग्रहयोग, दशा बदलत असतात . 







Friday, 20 June 2014

गुरु बदल -भाग १ ( Jupiter Transit -2014 )

बऱ्याच वेळा वापरला जाणारा शब्द म्हणजे ग्रह ' बदल '  ग्रह बदलणे म्हणजे काय तर सध्या ज्या राशीत ग्रह आहे त्याच्या पुढच्या राशीत जाणे . जर ग्रह वक्री असेल तर तो ज्या राशीत सध्या आहे त्याच्या मागील राशीत जातो . उदा . राहू व केतू हे नेहिमी वक्री असतात त्यामुळे राहू बदलतो म्हणजे तो त्याच्या आधीच्या राशीत जातो . सध्या राहू तूळ राशीत आहे . राहू बदल होईल तेव्हा तो कन्या राशीत जाईल .
ह्या लेख पुरता आपण गुरु बदलाचा विचार करू . १९ जून ला गुरु कर्केत आला आहे त्या आधी मिथुनेत होता आता साधारण वर्षभर गुरु कर्केतून  भ्रमण करेल म्हणजेच मिथुन राशीतून कर्क राशीत येणे हा सध्याचा (२०१४ ) ' गुरु बदल ' आहे . आता गुरु गोचरीने ( as per transit ) कर्केत आल्याने त्याचा प्रत्येक राशीच्या लोकांवर काय परिणाम होईल ? ते बघुयात . त्यासाठी गुरु ह्या ग्रहाची माहिती असणे आवश्यक आहे . गुरु हा शुभ ग्रह आहे . बाकी गुरु ग्रह बद्दलची माहिती इथे http://anaghabhade.blogspot.in/2013/12/blog-post_27.html दिली आहेच .

गोचर गुरुचे परिणाम आपल्या चंद्र राशीप्रमाणे तसेच लग्न राशीप्रमाणे वाचावे .
 . समजा तुमची चंद्र रास मेष आहे व लग्न रास कर्क तर मग  तुम्हाला कर्केत असणारा गुरु चंद्र राशीला चौथा आहे व लग्न राशीला पहिला . त्यामुळे मेष व कर्क दोन्ही राशींमधील गुरु बदलाचे परिणाम वाचावेत . बऱ्याच  जणांचे मत आहे कि गोचार( transits  ) चंद्र राशीकडून येतात बऱ्याच जणांचे मत असते कि transits लग्न राशीकडून अनुभवास येतात .
 तुम्हाला जास्त काय APPLY होते ते तुम्ही थोडा अभ्यास करून ठरवू शकता . तसेच गोचर भ्रमणाचे परिणाम हे तुमची मूळ पत्रिका त्यातील चालू असणाऱ्या दशा ह्या सर्वांवर  अवलंबून आहेच . मग गोचर भ्रमण महत्वाचे आहे का ? तर ह्याचे उत्तर ' हो ' असेच द्यावे लागेल कारण जेव्हा एखादा फलादेश सांगितला जातो त्यावेळेस गोचर भ्रमण पण लक्षात घेऊनच तर्क  केले जातात . त्यामुळे फक्त गोचरीने येणारा ग्रह भविष्य बदलत नाही तर त्यात catalyst ची भूमिका करतो . गोचर ग्रह शुभ परिणाम सांगत असतील व बाकी दशा पण प्रगतीकारक असतील तर त्या पत्रिकेच्या दर्जा प्रमाणे त्याकाळात प्रगती होईलच परंतु दशा अनुकूल असून गोचर ग्रह साथ देत नसतील तर प्रगती मध्ये काही काळ अडथळे किंवा विलंब होऊ शकतो . त्या उलट जर दशा अशुभ असतील व गोचर भ्रमण  शुभ असेल तर कदाचित होणारा अनर्थ तात्पुरता टळू शकतो किंवा त्याची तिव्रता कमी होते .
आता प्रत्येक राशीला आत्ता कर्केत असणारा गुरु काय फळे देईल ह्यासाठी कर्क रास त्या राशीपासून कितवी आहे हे मोजा म्हणजे आपल्या राशीला सध्याचा गुरु कितवा आहे हे कळेल त्याप्रमाणे मग त्या स्थानातून बघितल्या जाणार्या गोष्टी व गुरु ग्रहाचा स्वभाव ह्याची सांगड घाला त्यावरून सध्याचा गोचरीचा गुरु आपल्याला कसा आहे त्याचा अंदाज बांधता  येईल . तसेच गुरु हा शुभ ग्रह आहे त्याची दृष्टी अत्यंत शुभ मानली जाते . गुरू स्वत: च्या स्थानापासून ५,७,९ ह्या स्थानावर बघतो त्यामुळे जर तुमच्या पत्रिकेत कर्केत , वृश्चिकेत , मकरेत किंवा मीनेत जेवढे ग्रह असतील त्या सर्वांवर  कर्केतील गुरूची दृष्टी पडेल  व त्याचे शुभ परिणाम अनुभवास येतील .तसेच गुरुचे भ्रमण पत्रिकेतील ज्या  ग्रहावरून होते त्या ग्रहाच्या कारकत्वा नुसार शुभ परिणाम अनुभवास येतात . उदा . जन्म पत्रिकेतील शुक्रावरून गुरुचे भ्रमण विवाह सौख्यास  पोषकच असते.
( सध्या गुरु कर्क राशीत आहे  जन्म पत्रिकेत कोणते कोणते ग्रह कर्केत आहेत . कदाचित काही असतील कदाचित एकही नाही . )

आता जर तुमची चंद्र रास किंवा लग्नरास मेष आहे तर कर्क रास मेषेपासून चौथी आहे म्हणजे मेष राशीला सध्या चौथा गुरु आहे . जर तुमची चंद्र रास किंवा लग्नरास वृषभ  आहे तर कर्क रास वृषभ राशीपासून  तिसरी आहे म्हणजे वृषभ राशीला सध्या तिसरा गुरु आहे . ह्याप्रमाणेच मिथुन राशीवाल्याना दुसरा गुरु ,कर्क राशीवाल्याना पहिला गुरु , सिंह राशीवाल्याना बारावा  गुरु, कन्या राशीवाल्याना अकरावा गुरु, तूळ राशीवाल्याना दहावा  गुरु, वृश्चिक राशीवाल्याना नववा  गुरु, धनु राशीवाल्याना आठवा  गुरु, मकर राशीवाल्याना सातवा  गुरु, कुंभ राशीवाल्याना सहावा  गुरु,मीन राशीवाल्याना पाचवा गुरु आहे . (इथे सध्याचा गोचरीचा  कर्क राशीतील गुरु धरला आहे ) . 
आता तुमची रास कोणती हे तुम्हाला माहित असेल तर  तुमच्या राशीला कितवा हे लगेचच कळेल . 
प्रत्येक  राशीला सध्याचे गुरुभ्रमण कसे आहे ते पुढच्या लेखात  बघुयात . 

Wednesday, 28 May 2014

ब्लॉगच्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.


नुकताच दहा हजार pageviews चा टप्पा पार झाला . त्यासाठी ब्लोग च्या सर्व वाचकांचे मनापासून आभार ! 


सध्या बरेच दिवसात काही लिहिणे झाले नाही परंतु आता लवकरच पुढचा लेख लिहीन . 
वाचकांच्या चांगल्या प्रतिसादाने लिहियाला नक्कीच हुरूप येतो .