Title

Astrology Blog by Anagha Bhade


Thursday, 21 August 2014

शिक्षण आणि पत्रिका - भाग २

मागील लेखात आपण शिक्षण आणि पत्रिका ह्याबाबतीतला आढावा घेतला .  ह्या लेखात ग्रह आणि भाव साधारण कोणती शिक्षण शाखा सुचवतात हे पाहू.

कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शिक्षणाकरता लक्षात घ्यावा लागतो .

हा उपनक्षत्र स्वामी जर बुध किंवा गुरु शी सबंधित( बुध , गुरु असेल किंवा बुध - गुरु च्या नक्षत्रात असेल ) असेल तर शिक्षण चांगले होते . तसेच चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी ४, ९,११ ह्या भावांचा कार्येश असेल तर शिक्षण व्यवस्थित पूर्ण होते . अर्थात त्या काळात येणाऱ्या दशा सुद्धा ४,९, ११ हि स्थाने देणाऱ्या हव्यात त्या जर उलट्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या ३,८ स्थानाच्या असतील तर शिक्षणात अडचणी येतात . अडचणी येतात म्हणजे खूप मेहनत करावी लागते सहज यश मिळत नाही . 
आता चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे व तो कोणत्या ग्रहाच्या नक्षत्रात आहे  ते बघावे तसेच 
कोणकोणत्या भावांचा कार्येश आहे ते बघून मग साधारणपणे शिक्षण शाखा ठरवू शकतो . तसेच आयुष्यात पुढे येणाऱ्या महादशा कोणते क्षेत्र सुचवते आहे ह्याचा  सारासार विचार करून मग ठरवावे . 

जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी रवि असेल किंवा रवीच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे रवि ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते . उदा . वैद्यकशास्त्र ( medical field )  , administration , politics , astronomy इ. 
उदा . आता समजा चतुर्थ स्थानाचा उ. न स्वामी रवि व मंगळ ह्यांच्याशी सबंधित  असून १, ८, ५,१२ ह्या भावांचा कार्येश असेल    
व मेष , वृश्चिक , सिंह , मीन ह्या राशीचा प्रभाव असेल ( म्हणजे ह्या राशीत प्रामुख्याने ग्रह असतील ) ,तसेच पत्रिकेचा शैक्षणिक दर्जा पण चांगला असेल तर मग ' सर्जन' होण्यासाठी ती पत्रिका SUPPORTING आहे असे म्हणता येईल . 
एकदा जर वैद्यक शाखा निश्चित केली तर मग ग्रह , राशी भाव ह्याप्रमाणे मग आयुर्वेद , homeopathy , allopathy ह्या शाखा ठरवता येतात तसेच समजा allopathy नक्की झाले तर मग पुढील शिक्षण कोणते क्षेत्र दाखवते हे पण बघता येते . उदा . जर शुक्र, रवि,चंद्र , मंगळ हे ग्रह वृषभ ,मीन , वृश्चिक , मेष ह्या राशी व २, १२,८,१ हे भाव असतील तर मग डोळ्यांचे डॉक्टर (आय सर्जन ) होता येईल .

जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी चंद्र असेल किंवा चंद्राच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे चंद्र  ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते . उदा . चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे तसेच जलपदार्थ , ताज्या भाज्या , वाहतूक , पाककला इ. गोष्टी चंद्रावरून बघतात त्यामुळे मानसशास्त्र ,  नेव्ही , शेती,नर्सिंग , सुगंधी द्रव्ये इ. क्षेत्र  चंद्राच्या अधिपत्याखाली येतात . त्यामुळे Agriculture and food engg , dairy technology , pscyhology , bio- chemical , लहान  मुलांचे शिक्षण क्षेत्र इ. गोष्टींसाठी चंद्र अनुकूल असतो . 
आता प्रत्येक क्षेत्र हे कोण्या एका ग्रहामुळेच ठरत नसून हे ग्रह , राशी भाव ह्यांचे combination बघावे लागते . 
उदा .psycology मध्ये चंद्र , बुध , गुरु हे ग्रह कर्क, मीन , मेष , मिथुन ह्या राशी आणि ४,३,१२ हे भाव ह्या सगळ्या गोष्टीं असाव्या लागतात . 

जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी मंगळ असेल किंवा मंगळाच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे मंगळ  ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते .
उदा. energy , power ,electricity , fire , जमीन etc . 
त्यामुळे प्रामुख्याने अभियांत्रिकी ( enggineering ) , मिलिटरी , बांधकाम , रवि पण असेल तर मग सर्जरी , पोलिस खाते इ. क्षेत्रासाठी अनुकूल असातो . 
एक उदाहरण द्यायचे झाल्यास electrical engineering करता मंगळा बरोबर बुधाचा विचार होतो तसेच मेष ,सिंह ,वृश्चिक ह्या राशी व ३, ८, ११ हे भाव महत्वाचे असतात . 

वर म्हटल्याप्रमाणे केवळ एक ग्रह ठराविक शाखेकरता कारणीभूत नसतो तर ग्रह ,राशी ,भाव ह्यांचे combination बघावे लागते व पुढे येणाऱ्या दशा ह्या सगळ्यांचा समग्र विचार करून मग दिशा ठरवता येते .

बाकी ग्रहांबद्दलची माहिती पुढील भागात बघुयात .


Monday, 28 July 2014

शिक्षण आणि पत्रिका भाग -१

आजकाल शिक्षण हा विषय फारच महत्वाचा झाला आहे . चांगल्या करियर करता चांगले शिक्षण आवश्यक आहे हे आता सर्वमान्यच आहे . त्यामुळे पालक सुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत खूपच जागरूक असतात . आता वाढती competition आणि अवाढव्य फिया ह्यामधून योग्य त्या शिक्षणाची शाखा निवडणे म्हणजे फारच अवघड होऊन बसले आहे . पुन्हा काही मोजकी मुले सोडली तर बहुतांशी मुले स्वत:ला काय आवडतंय किंवा कोणत्या विषयात गती आहे . पुढे जाऊन काय करायचं आहे ह्याविषयी गोंधळलेली असतात . अशात आई वडील म्हणतात म्हणून एखाद्या  शाखेला प्रवेश मिळावा म्हणून धडपडत असतात .  ह्या सर्व गोष्टींचा ताण मुलांवर असतो आई वडील सुद्धा मुलाच्या करियरच तेवढेच टेन्शन घेतात . अशा परिस्थिती मध्ये पत्रिकेतून काही मार्गदर्शन मिळू शकते का ?तर हो !
पत्रिकेवरून मुळात मुलाची बुद्धिमत्ता , कल /आवड , कोणते क्षेत्र मुलाकरता ( इथे 'मुलाकरता ' हा शब्द मुले म्हणजे kids मुलगा / मुलगी ह्या दृष्टीने  वापरला आहे . नुसते मुलगे असे नव्हे ) चांगले आहे , कोणते शिक्षण घेतल्यास फायदा होईल , करियर च्या दृष्टीने पुढे येणारा काळ कोणत्या क्षेत्रात काम करण्यास जास्त supporting आहे ह्या गोष्टींचा अंदाज येतो . तसेच जर एखादे वेळेस २-३ options मध्ये कोणती side निवडावी ह्याबाबतीत गोंधळ होत असेल तर पत्रिकेतून जास्त suitable option निवडण्यास मदत होऊ शकते .
आता पत्रिकेतून शिक्षणासंबंधी विचार कसा करायचा ते बघू .
ह्याबाबतीत मला कृष्णमुर्ती पद्धत जास्त प्रभावी वाटते . कृष्णमुर्ती पद्धती नुसार चतुर्थ स्थान,नवम स्थान व लाभ स्थान  हे शिक्षणाच्या दृष्टीने बघितले जाते . चतुर्थ स्थानावरून साधारण पणे graduation पर्यंत च्या शिक्षणाचा विचार केला जातो नवम स्थानावरून उच्च शिक्षणाचा विचार होतो व लाभ स्थान हे सर्व प्रकारच्या लाभा करता विचारात घेतले जाते त्यामुळे शिक्षणाचा विचार करताना ४,९,११ हि महत्वाची स्थाने होत . तसेच ३,८ हि स्थाने शिक्षणाला विरोध करणारी किंवा अडथळे आणणारी आहेत .त्यामुळे साहजिकच ४,९,११  हि स्थाने कार्यान्वयित असणाऱ्या दशा शिक्षणाला पोषक व ३, ८ च्या दशा त्यामानाने अडचणी उत्पन्न करणाऱ्या असतात .
चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शिक्षणाच्या दृष्टीने विचारात घ्यावा लागतो . प्रथम पत्रिका बघताना शिक्षणाचा प्रश्न असेल तर चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघावा तो रुलिंग  मध्ये आहे का ते पाहावे . जर रुलिंग मध्ये असेल तर जन्मवेळ बरोबर आहे जर नसेल तर त्या उपनक्षत्र स्वामी च्या जवळचा ग्रह जो रुलिंग मध्ये आहे तो उ. न स्वामी म्हणून समजून त्याप्रमाणे जन्मवेळ शुद्ध करून घ्यावी . अशाप्रकारे जर २-४ मिनिटांचा जन्म वेळेत फरक असेल तर तो error काढता येतो . 
आता एकदा चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी ठरला कि मग तो  ग्रह कोणता आहे ? कोणाच्या नक्षत्रात आहे ? कोणकोणत्या भावांचा कार्येश आहे . तसेच पुढे येणाऱ्या दशा कोणत्या दिशेच्या / क्षेत्राच्या दृष्टीने जास्त supporting आहेत हे बघून मग  एक दिशा मिळू शकते . 
प्रत्येक ग्रहानुसार आणि पत्रिकेतील भावानुसार क्षेत्र ठरतात .  त्यामुळे  सर्वांचा तारतम्याने  विचार करून तसेच  मग ठरवता येते . आता कोणते ग्रह , भाव  कोणती क्षेत्रे दाखवतात  त्याचा विचार पुढच्या भागात करू . 


Friday, 27 June 2014

गुरु बदल - भाग २ ( Jupiter Transit 2014 )

गुरु  कर्क राशीत १८ जून १२०१४ पासून १३ जुलै २०१५ पर्यंत आहे .

सध्याच्या कर्क राशीतील गुरु ग्रहाच्या भ्रमणाचा प्रत्येक राशीनुसार होणार्या परिणामाचा ढोबळ अंदाज : 
( अर्थातच ह्या अंदाजात प्रत्येकाच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती तसेच दशा ह्यांचा विचार  नसल्याने  ' ढोबळ ' अंदाज असे म्हंटले आहे ) 


मेष रास : 
सध्या मेष  राशीला चौथा गुरु आहे. गृहसौख्य चांगले राहील . विद्यार्थ्यांना पण चतुर्थ स्थानातील गुरु शिक्षणाच्या दृष्टीने चांगलाच असतो . गृह खरेदी , वाहन खरेदी या करता पण अनुकूल . इथल्या गुरूची दृष्टी जरी दशमावर येत असली तर प्रमोशन वगेरे साठी  हा गुरु तितकासा उपयोगी नाही  . 


वृषभ रास : 
सध्या वृषभ राशीला तिसरा गुरु आहे . तृतीय स्थान   आहे , त्यामुळे छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे . तृतीय स्थानावरून लेखन ,  प्रकाशन , media इ. विचार केला जातो . त्यामुळे ह्या क्षेत्रातील लोकांसाठी काही नवीन संधी घेऊन येईल . सप्तमावर व लाभ स्थानावर तृतीयातील गुरूची दृष्टी असेल . 

मिथुन  रास : 
सध्या मिथुन  राशीला दुसरा गुरु आहे . द्वितीय स्थानावरून आर्थिक प्रगती (द्वितीय  हे २,६,१० ह्या अर्थ त्रिकोणातील स्थान आहे  )  , कुटुंबवृद्धी इ. गोष्टी बघितल्या जातात इथला गुरु ह्या गोष्टी वृद्धिंगत करणारा ग्रह आहे त्यामुळे आर्थिक मान वाढेल . कटुंब वृद्धी म्हणजे संतती साठी प्रयंत्न करणाऱ्या लोकांना संतती प्राप्ती तसेच लग्नाळू लोकांचे विवाह होणे.इ. गोष्टी शक्य आहेत .नोकरी / व्यवसायाच्या दृष्टीने काही संधी उपलब्ध करून देईल . 

कर्क रास : 
सध्या कर्क राशीला पहिला गुरु आहे . प्रथम स्थानावरून म्हणजे चंद्र राशीप्रमाणे चंद्रावरून गुरुचे भ्रमण होत आहे . चंद्र हा मनाचा कारक  ग्रह आहे . प्रथम स्थानातील गुरु आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने फारसा उपयुक्त नसला तरी गुरुसारखा शुभ ग्रह नक्कीच मन प्रसन्न ठेवेल  positive energy निर्माण करेल . तसेच गुरूची दृष्टी पंचम ,सप्तम  व नवम स्थानावरून बघितल्या जाणार्या गोष्टीचे शुभ परिणाम दिसतील . 

सिंह रास : 
सध्या सिंह राशीला बारावा गुरु आहे .व्यय स्थानातील गुरु अध्यात्मिक प्रगतीसाठी  चांगला असतो . बारावे स्थान हे मोक्ष त्रिकोणातील (म्हणजे ४,८,१२ ) महत्वाचे महत्वाचे स्थान आहे . हा गुरु आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने प्रभावी  नसला तरी
नियोजन ( planning ) च्या दृष्टीने उपयुक्त असतो .बारावे स्थान हे परदेश गमनासाठीचे (Long distance journey ) साठी महत्वाचे स्थान आहे . त्यामुळे प्रवास पण शक्य आहे . 

कन्या रास : 
सध्या कन्या  राशीला अकरावा  गुरु आहे . अकराव्या स्थानातील  सगळे ग्रह हे लाभदायक असतात . इथे कन्या राशीला गुरु हा तृतीयेश व सप्तमेश आहे त्यामुळे भावंडाकडून किंवा जोडीदाराकडून फायदा . सप्तमावरून business partner चा पण विचार होतो त्यामुळे भागीदारीत फायदा असेही logic लावता येईल . तसेच लाभ स्थान हे सर्व प्रकारच्या लाभाकरता विचारात घेतले जाते त्यामुळे विवाह , संतती , नोकरी , घर खरेदी  इ. सर्व  गोष्टी मध्ये गुरु मुळे सहाय्याच होईल .कन्या राशील तर जेव्हा शनि वृश्चिकेत जाईल  तेव्हा तृतीय शनि आणि अकरावा गुरु म्हणजे तर 'बहुत अच्छे दिन ! ' 

तूळ रास : 
सध्या तूळ राशीला दहावा गुरु आहे .दशमातील गुरु हा नोकरी / व्यवसायाच्या दृष्टीने प्रगतीकारक असतो परंतु कधीकधी बर्याच अवघड परिस्थिती निर्माण करतो . यश मिळणे अवघड असले तरी प्रगतीकाराकच असतो . ह्या काळात patience ची गरज असते . दशमातील ग्रह सर्वसाधारण पणे कामाचा ताण वाढवतात. २, ६ , १० ह्या अर्थ त्रिकोणातील गुरुची आर्थिकबाजू चांगली बाजू राहण्याच्या  दृष्टीने शुभ फ़लेच  मिळतात . 

 वृश्चिक रास : 
सध्या वृश्चिक राशीला नववा  गुरु आहे . मागील वर्षभर आठवा गुरु असल्याने बर्याच कामांमध्ये अडचणी  येत असतील तर  आता पासून नवव्या गुरु मुळे त्या दूर होतील तसेच नवीन संधी पण मिळू शकतील .  नवम स्थानातील गुरूमुळे धार्मिकस्थळांना भेट देण्याचा योग येऊ शकतो .  तसेच नवामातील गुरु तृतीय स्थानाला बघत असल्याने व ३, ९ हि 
प्रवासाची स्थाने आहेतच त्यामुळे प्रवास होतील . नवमातील गुरु पंचम स्थानाला व प्रथमस्थानाला पण बघतो  
त्यामुळे मुलांच्या दृष्टीने पण चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे . 

धनु रास : 
सध्या धनु राशीला आठवा  गुरु आहे .सर्वसाधारण पण अष्टमातील ग्रह हे अडथळे उत्पन्न करणारे , मनस्ताप देणारे असतात . गुरु हा मुळात शुभ ग्रह असल्याने  मनस्ताप होईलच  असे नाही परंतु साधारण पणे  'जैसे थे '  परिस्थिती ठेवणारा हा गुरु आहे . 

मकर रास : 
सध्या मकर राशीला सातवा गुरु आहे .सप्तमातील गुरु हा वैवाहिक सुखास चांगला ! लग्नाळू मुला/ मुलांची लग्न ठरण्याच्या दृष्टीने पोषक . तसेच सप्तमातील गुरूची दृष्टी तृतीय व लाभ स्थानावर असल्याने छोटे प्रवास पण आनंददायी 
ठरू शकतात . तसेच सप्तमावरून भागीदारांचा विचार  करत असल्याने चांगले भागीदार मिळू शकतात . सप्तमातील गुरु  लोकसंग्रह / ओळखी वाढवणारा आहे . 

कुंभ रास :
सध्या कुंभ राशीला  सहावा गुरु आहे .षष्ठ स्थान हे विरोधकांचे तसेच आजारांचे स्थान आहे गुरु कोणतीही गोष्ट वाढवतो त्यामुळे ह्या स्थानातील गुरु आजारपणे आणि आणि विरोधक वाढवणार . अर्थातच आता लगेच माझी कुंभ रास आहे आणि षष्ठात गुरु म्हणजे आजारी पडणार असे नव्हे तर जर दशा पण आजारपणाच्या असतील तरच त्याचा प्रभाव दिसून येईल . षष्ठ स्थान हे अर्थ त्रिकोणातील स्थान आहे त्यामुळे आर्थिक प्रगती  पण होईल . 

 मीन रास :
सध्या मीन राशीला पाचवा  गुरु आहे .चंद्राच्या पंचमातील गुरुची चंद्रावर पूर्ण दृष्टी असते . पंचमातील गुरु भ्रमण हे शुभ मानले आहे .  पंचम स्थान हे संततीे   स्थान आहे त्यामुळे मुलांच्या ( kids ) दृष्टीने प्रयत्न करणार्यांना हे वर्ष अपत्य प्राप्तीच्या दृष्टीने चांगले आहे . तसेच मुले असणाऱ्या लोकांना पण मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने शुभ . पंचम स्थानाशी सबंधित व्यवसाय / नोकरी असणाऱ्या म्हणजे कला , क्रीडा इ. क्षेत्रातील लोकांना पण चांगले जाईल . 

सर्वसाधारण पणे  ग्रहाचा स्वभाव व तो ज्या स्थानात येत आहे त्या स्थानावरून बघितल्या जाणाऱ्या गोष्टींची सांगड घालून हे लिहिले आहे तुम्ही सुद्धा असे लॉजिक लावून अजून conclusions काढू शकाल . 
आधी लिहिले त्याप्रमाणे हा फक्त ढोबळ अंदाज आहे कारण अर्थातच प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असते त्याप्रमाणे ग्रहयोग, दशा बदलत असतात . 







Friday, 20 June 2014

गुरु बदल -भाग १ ( Jupiter Transit -2014 )

बऱ्याच वेळा वापरला जाणारा शब्द म्हणजे ग्रह ' बदल '  ग्रह बदलणे म्हणजे काय तर सध्या ज्या राशीत ग्रह आहे त्याच्या पुढच्या राशीत जाणे . जर ग्रह वक्री असेल तर तो ज्या राशीत सध्या आहे त्याच्या मागील राशीत जातो . उदा . राहू व केतू हे नेहिमी वक्री असतात त्यामुळे राहू बदलतो म्हणजे तो त्याच्या आधीच्या राशीत जातो . सध्या राहू तूळ राशीत आहे . राहू बदल होईल तेव्हा तो कन्या राशीत जाईल .
ह्या लेख पुरता आपण गुरु बदलाचा विचार करू . १९ जून ला गुरु कर्केत आला आहे त्या आधी मिथुनेत होता आता साधारण वर्षभर गुरु कर्केतून  भ्रमण करेल म्हणजेच मिथुन राशीतून कर्क राशीत येणे हा सध्याचा (२०१४ ) ' गुरु बदल ' आहे . आता गुरु गोचरीने ( as per transit ) कर्केत आल्याने त्याचा प्रत्येक राशीच्या लोकांवर काय परिणाम होईल ? ते बघुयात . त्यासाठी गुरु ह्या ग्रहाची माहिती असणे आवश्यक आहे . गुरु हा शुभ ग्रह आहे . बाकी गुरु ग्रह बद्दलची माहिती इथे http://anaghabhade.blogspot.in/2013/12/blog-post_27.html दिली आहेच .

गोचर गुरुचे परिणाम आपल्या चंद्र राशीप्रमाणे तसेच लग्न राशीप्रमाणे वाचावे .
 . समजा तुमची चंद्र रास मेष आहे व लग्न रास कर्क तर मग  तुम्हाला कर्केत असणारा गुरु चंद्र राशीला चौथा आहे व लग्न राशीला पहिला . त्यामुळे मेष व कर्क दोन्ही राशींमधील गुरु बदलाचे परिणाम वाचावेत . बऱ्याच  जणांचे मत आहे कि गोचार( transits  ) चंद्र राशीकडून येतात बऱ्याच जणांचे मत असते कि transits लग्न राशीकडून अनुभवास येतात .
 तुम्हाला जास्त काय APPLY होते ते तुम्ही थोडा अभ्यास करून ठरवू शकता . तसेच गोचर भ्रमणाचे परिणाम हे तुमची मूळ पत्रिका त्यातील चालू असणाऱ्या दशा ह्या सर्वांवर  अवलंबून आहेच . मग गोचर भ्रमण महत्वाचे आहे का ? तर ह्याचे उत्तर ' हो ' असेच द्यावे लागेल कारण जेव्हा एखादा फलादेश सांगितला जातो त्यावेळेस गोचर भ्रमण पण लक्षात घेऊनच तर्क  केले जातात . त्यामुळे फक्त गोचरीने येणारा ग्रह भविष्य बदलत नाही तर त्यात catalyst ची भूमिका करतो . गोचर ग्रह शुभ परिणाम सांगत असतील व बाकी दशा पण प्रगतीकारक असतील तर त्या पत्रिकेच्या दर्जा प्रमाणे त्याकाळात प्रगती होईलच परंतु दशा अनुकूल असून गोचर ग्रह साथ देत नसतील तर प्रगती मध्ये काही काळ अडथळे किंवा विलंब होऊ शकतो . त्या उलट जर दशा अशुभ असतील व गोचर भ्रमण  शुभ असेल तर कदाचित होणारा अनर्थ तात्पुरता टळू शकतो किंवा त्याची तिव्रता कमी होते .
आता प्रत्येक राशीला आत्ता कर्केत असणारा गुरु काय फळे देईल ह्यासाठी कर्क रास त्या राशीपासून कितवी आहे हे मोजा म्हणजे आपल्या राशीला सध्याचा गुरु कितवा आहे हे कळेल त्याप्रमाणे मग त्या स्थानातून बघितल्या जाणार्या गोष्टी व गुरु ग्रहाचा स्वभाव ह्याची सांगड घाला त्यावरून सध्याचा गोचरीचा गुरु आपल्याला कसा आहे त्याचा अंदाज बांधता  येईल . तसेच गुरु हा शुभ ग्रह आहे त्याची दृष्टी अत्यंत शुभ मानली जाते . गुरू स्वत: च्या स्थानापासून ५,७,९ ह्या स्थानावर बघतो त्यामुळे जर तुमच्या पत्रिकेत कर्केत , वृश्चिकेत , मकरेत किंवा मीनेत जेवढे ग्रह असतील त्या सर्वांवर  कर्केतील गुरूची दृष्टी पडेल  व त्याचे शुभ परिणाम अनुभवास येतील .तसेच गुरुचे भ्रमण पत्रिकेतील ज्या  ग्रहावरून होते त्या ग्रहाच्या कारकत्वा नुसार शुभ परिणाम अनुभवास येतात . उदा . जन्म पत्रिकेतील शुक्रावरून गुरुचे भ्रमण विवाह सौख्यास  पोषकच असते.
( सध्या गुरु कर्क राशीत आहे  जन्म पत्रिकेत कोणते कोणते ग्रह कर्केत आहेत . कदाचित काही असतील कदाचित एकही नाही . )

आता जर तुमची चंद्र रास किंवा लग्नरास मेष आहे तर कर्क रास मेषेपासून चौथी आहे म्हणजे मेष राशीला सध्या चौथा गुरु आहे . जर तुमची चंद्र रास किंवा लग्नरास वृषभ  आहे तर कर्क रास वृषभ राशीपासून  तिसरी आहे म्हणजे वृषभ राशीला सध्या तिसरा गुरु आहे . ह्याप्रमाणेच मिथुन राशीवाल्याना दुसरा गुरु ,कर्क राशीवाल्याना पहिला गुरु , सिंह राशीवाल्याना बारावा  गुरु, कन्या राशीवाल्याना अकरावा गुरु, तूळ राशीवाल्याना दहावा  गुरु, वृश्चिक राशीवाल्याना नववा  गुरु, धनु राशीवाल्याना आठवा  गुरु, मकर राशीवाल्याना सातवा  गुरु, कुंभ राशीवाल्याना सहावा  गुरु,मीन राशीवाल्याना पाचवा गुरु आहे . (इथे सध्याचा गोचरीचा  कर्क राशीतील गुरु धरला आहे ) . 
आता तुमची रास कोणती हे तुम्हाला माहित असेल तर  तुमच्या राशीला कितवा हे लगेचच कळेल . 
प्रत्येक  राशीला सध्याचे गुरुभ्रमण कसे आहे ते पुढच्या लेखात  बघुयात . 

Wednesday, 28 May 2014

ब्लॉगच्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.


नुकताच दहा हजार pageviews चा टप्पा पार झाला . त्यासाठी ब्लोग च्या सर्व वाचकांचे मनापासून आभार ! 


सध्या बरेच दिवसात काही लिहिणे झाले नाही परंतु आता लवकरच पुढचा लेख लिहीन . 
वाचकांच्या चांगल्या प्रतिसादाने लिहियाला नक्कीच हुरूप येतो . 

Monday, 5 May 2014

मंगळ दोष ( Mangalik ) ????

पत्रिकेतील मंगळाचे लग्न ठरवताना एक वेगळेच महत्व आहे . ' मंगळ आहे ' किंवा ' मंगळ दोष आहे ' किंवा मग' मांगलिक आहे' हे  शब्द बर्याच वेळेला एकू येतात . पण 'मंगळ  असणे 'म्हणजे काय ते आधी बघू आणी मग त्या मंगळ  असण्याला कितपत महत्व द्यायचे ते तुम्ही स्वत :च ठरवू शकता .

मंगळ आहे म्हणजे पत्रिकेतील १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ  असणे . दक्षिणेत द्वितीय स्थानातील मंगळ  पण 'मंगळ दोष 'धरतात. पण ह्या स्थानात नुसता मंगळ  असला तरी तो कोणत्या राशीत आहे ? रवि बरोबर आहे का ? कोणत्या ग्रहाच्या दृष्टीत  आहे ? इ . बाबींवर 'मंगळ  दोष ' असणे अवलंबून आहे . परत त्यात सौम्य मंगळ व कडक मंगळ हे प्रकार पण आहेतच . 

मंगळाला चौथी , सातवी , आठवी  असते . जेव्हा मंगळ  १, ४, ७आणि १२ ह्या स्थानात असतो तेव्हा तो सप्तमस्थानाला  ( विवाह स्थान ) दृष्टी ठेवून असतो .

सर्वप्रथम ह्याला ' मंगळ दोष ' का म्हणत असावेत त्याचे लॉजिक बघुयात . मंगळ हा मुळात एक पापग्रह धरला आहे . मंगळ म्हणजे आक्रमकता , धडाडी , प्रसंगी राग , सडेतोड स्वभाव . मंगळाच्या स्वभावात ' जमवून घेणे किंवा नमते घेणे '   हे प्रकार नाहीतच त्यामुळे नवरा- बायको हे नाते टिकण्यासाठी जी adjustment / compromises करावे लागतात त्यात मंगळाचा उपयोग तर नाहीच पण विरोधच जास्त होईल . त्यामुळे सप्तम स्थानावर ( विवाह स्थान ) जर मंगळाची दृष्टी असेल तर अर्थातच कदाचित तो त्याच्या अंगभूत स्वभावामुळे  नात्यामध्ये ताण आणू  शकेल . पण ह्यासाठी मंगळ पत्रिकेत किती प्रभावी आहे हे बघणे आवश्यक आहे . 

सर्वसामान्यपणे  'मंगळ आहे ' म्हणजे पत्रिकेतील १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ  असणे . परंतु खालील पैकी जर मंगळाची स्थिती असेल तर तो निर्दोष मानतात . ( निर्दोष म्हणजे ' मंगळ  असण्याचा ' कोणताही अपाय नाही . त्यामुळे ' मंगळ  आहे ' म्हणून घाबरू नये . )  

पंचांगात जे 'निर्दोष मंगळाचे 'नियम दिले आहेत ते खालीलप्रमाणे : 

मंगळ कर्क राशीत ( नीच राशीत ) , मिथुन किंवा कन्या राशीत ( त्याच्या शत्रू राशीत ) असल्यास , मंगळ  रवि बरोबर म्हणजे अस्तंगत असल्यास , प्रथमत मेषेचा , चतुर्थात वृश्चिक राशीत , सप्तमात मकर राशीत , अष्टमात सिंह राशीत आणि बाराव्या स्थानी धनु राशीत असल्यास  मंगळ  निर्दोष समजतात . 
आता ह्या सगळ्या  नियमानुसा जर मंगळ निर्दोष होत नसेल आणि जर शुभ ग्रहांच्या दृष्टीत असेल तर सौम्य मंगळ आहे असे म्हणतात . 
आता समजा एवाढे फिल्टर्स लावून ' सदोष मंगळ  निघालाच तर मग वधू  - वरांच्या दोघांच्याही पत्रिकेत सदोष मंगळ असेल तर चालते किंवा समजा एकाच्या पत्रिकेत सदोष मंगळ  आहे व दुसर्याच्या पत्रिकेत १,४,७,८,१२ ह्या स्थानात शनि असेल तर किंवा शनीची दृष्टी सप्तमावर असेल तर प्रथमात किंवा सप्तमात गुरु / शुक्र असेल तर अथवा  सप्तमावर त्यांची दृष्टी असेल तर किंवा  प्रथमात किंवा सप्तमात राहू - केतू असतील तर  अशी पत्रिका पण ' मंगळ असणाऱ्या पत्रिकेला चालु  शकते . 

एका दिवसात १२ लग्न राशी (दर दोन तासानी एक लग्न रास बदलत असते ) आणि १२ लग्न राशींच्या पत्रिके पैकी ५ लग्न राशीच्या पत्रिकेत एक तर १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ येणार म्हणजे ह्या लोकांच्या पत्रिका ' मंगळ आहे ' ह्या category  मध्ये जाणार . 

सदोष मंगळ असण्याच्या नियमांबरोबर अशावेळेस मंगळाची अवस्था ( बाल , कुमार, युवा , वृध्द, मृत  ) पण बघायला हवी कारण त्यातल्या त्यात कुमार आणि त्याही पेक्षा जास्त युवा अवस्थेतील मंगळ जास्त त्रासदायक होईल बाल ,वृद्ध 
आणि त्यामानाने मृत ग्रह काय प्रभाव टाकणार ? 

माझ्यामते एखादी वाईट घटना  हि कोणत्याही एका पापग्रहा मुळे  कधीही होत नाही तर त्या पापग्रहांचे इतर ग्रहांशी असलेले कुयोग ह्यांच्यामुळे घडत असते . त्यामुळे एकटा मंगळ  पण काय करणार , नाही  का  ? 
खरे बघायला गेले  तर शनी , राहू  , हर्षल हे पण पापग्रह धरले आहेत पण लग्नाच्या वेळेस मात्र मंगळालाच महत्व !

मला वाटते मंगळ हा लग्न ठरवताना पत्रिकेतील एक overrated ग्रह आहे . बघा , म्हणजे  उगाचच मंगळाला घाबरण्याचे 
कारण नाही . अगदी नियमाप्रमाणे पहिले तरी नुसते 'मंगळ  असण्याला 'सुद्धा बरेच अपवाद आहेत . त्यामुळे ' मंगळ आहे ' ह्या प्रकारचा फारसा बाऊ करू नये . 


Saturday, 26 April 2014

साडेसाती - शनि महाराजांचे ऑडिट

बऱ्याच लोकांना पत्रिकेबद्दल फारसे माहित नसले तरी साधारणपणे स्वत: ची रास माहित असते आणि रास माहिती असण्याचा उपयोग म्हणजे मुख्यत्वे राशी भविष्य वाचण्यासाठी  होतो नाहीतरी ' मला साडेसाती कधी आहे ? ' हे  बघण्यासाठी होतो . स्वत: च्या आयुष्यात जरी काही मनासारखे होत  नसेल , तब्येतीच्या काही तक्रारी असतील नाहीतर आर्थिक प्रोब्लेम्स सगळ्या अप्रिय गोष्टींचा आणि मनस्तापाचा सबंध लोक बर्याच साडेसातीशी  लावत असतात .

सगळ्यात आधी साडेसाती म्हणजे काय ते पाहू ,

जेव्हा गोचर शनि जन्मकुंडलीतील चंद्राच्या व्ययात , चंद्रावरून व चंद्राच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करतो त्यावेळेस साडेसाती आहे असे म्हणतात . ( शनि एका एकाराशीत अडीच वर्षे असतो त्यामुळे एकूण २. ५ +२. ५+२. ५=७. ५ )
उदा . जर एखादा माणूस तूळ राशीचा आहे तर जेव्हा गोचर ( transit ) शनि कन्येत जाईल तिथपासून ह्या माणसास साडेसाती सुरु झाली असे म्हणतात . गोचर शनि कन्या , तूळ , वृश्चिक ह्या राशीतून जाईल तो पर्यंत तूळ राशीला साडेसाती आहे असे म्हणतात एकदा का शनि धनु राशीत गेला कि तुळेची साडेसाती संपली . मग वृश्चिक राशीच्या माणसास साडेसाती सुरु .

साडेसाती मध्ये वाईटच होते असे काही नाही . बर्याच वेळा साडेसाती मध्ये जबादारी वाढते  अर्थात चांगल्या अर्थाने म्हणजे लग्न होणे मुल होणे इ. पण साडेसातीच्या साडेसात वर्षांमध्ये होणार्या वाईट घटनांचा सबंध फक्त शनीची अवकृपा  म्हणून लावला जातो  .साडेसाती म्हणजे शनीचे audit ! तुम्ही केलेल्या चांगल्या व वाईट कर्मांचा तुमच्यावर होणारा परिणाम . नुसती साडेसाती आहे म्हणून त्रास होईल असे नाही तर  समजा दशा ,गोचर ग्रह हे पण जर विरोधात असतील तर साडेसातीचा त्रास होतो . तसेच तुमच्या पत्रिकेत जर तुमच्या राशीत ( म्हणजे चंद्र रास ) , चंद्राच्या मागच्या किंवा पुढच्या स्थानात जास्त ग्रह असतील किंवा साडेसाती दरम्यान शनीची दृष्टी ज्या स्थानावर पडणार आहे तिथे खूप ग्रह असतील तर साडेसाती मध्ये शनि तेवढ्या ग्रह वरून भ्रमण करेल व त्या स्थानावर दृष्टी टाकेल व त्रास कदाचित जास्त होईल . उदा : जर तूळ रास आहेत जन्मपत्रिके मध्ये जास्त ग्रह तुळेत ,कन्येत किंवा वृश्चिकेत असतील तर साडेसातीचा त्रास कदाचित जास्त होईल ( परत दशा बाकी गोचर हे बघावे लागेलच ) .


चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे त्यामुळे जेव्हा गोचर शनि तुमच्या जन्म राशीतून म्हणजे चंद्रावरून भ्रमण करतो (साडेसातीमधील मधली अडीच वर्षे )तेव्हा मानसिक त्रास तणाव शनि निर्माण करतो तुम्ही त्याच्या ह्या कसोटीतून चांगले तावून सुलाखून बाहेर येता  . अहंकार असणाऱ्या माणसाना अशा वेळेस  खुप त्रास होतो पण जो माणूस आधीपासूनच जमिनीवर आहे  . ' मी , माझे , माझ्यामुळे ' ह्या  शब्दांपासून लांब आहे त्याला शनिच्या साडेसाती  चा फारसा  त्रास होत  नाही  कारण शनि हा ग्रह जीवाला शिवाचे रूप दाखवणारा आहे . साडेसाती मध्ये माणूस बर्याच वेळा परिस्थिती मुळे  हतबल होतो . साडेसाती माणसाला संयम शिकवते , अधिक परिपक्व बनवते . 

बर्याच वेळा साडेसाती चा त्रास कमी होण्यासाठी उपाय काय ? असे विचारले जाते . दर शानिवारी शनि मंदिरात तेल घालणे , शनीचा मंत्र म्हणणे वगेरे उपाय सांगितले जातात त्याने खरेतर बहुतेक माणसाला चांगले कर्म करण्याची बुद्धी होत असावी आणि अहंकार कमी होत असावा असे वाटते  . समजा तुम्ही शनि मंदिरात जाताय ,मंत्र म्हणताय पण ते फक्त कोणीतरी  सांगितले म्हणून आणि एकीकडे घरातील स्वत: च्याच आई वडिलांशी निट  वागत नाही आहात , पैशाचा माज आहे , भ्रष्टाचार , काळा  पैसा मिळवण्यात मग्न आहात तर शनि महाराजाची शिक्षा भोगणे अटळ  आहे .
चांगल्या कर्मानीच शनि महाराज प्रसन्न होतील . 

आपल्या आयुष्यात चांगला , वाईट काळ खरेतर  येत जात असतोच .ते पत्रिकेतील एकंदर ग्रहयोग व महादशेवर अवलंबून आहे . पण सर्वसामान्य माणसाला ज्याचा ज्योतिषशास्त्र ह्या विषयाशी सबंध  नाही त्याला महादशा आणि ग्रहयोग ह्या  विषय ी फारशी माहिती नसते . सगळ्या वाईट घटनांचा सबंध फक्त  साडेसातीशी लावला जातो  . सगळ्यांना कोणती न कोणती महादशा जन्मभर चालूच असते  मग कधी प्रगती करणारी किंवा मग त्रासदायक किंवा मग विशेष वाईटही नाही किंवा फार चांगली पण नाही .  ज्या माणसाच्या दशा  पण नेमक्या साडेसातीच्या काळात
त्रासदायक असतात त्यांना बराच त्रास होण्याची शक्यता असते . महादाशेबद्दल एक वेगळा लेख लिहीनच पुढे .

शनि हा तुमच्या कर्माचे मोजमाप तुमच्या पदरात घालतो . चांगल्या कर्मांची चांगली फळे देतो  आणि मूळ पत्रिकेतील ग्रहयोग आणि महादशा  चांगल्या असतील आणि ह्या जन्मी पण कर्म चांगलीच असतील तर शनि कसा त्रास देईल नाही का ?  शेवटी चांगली पत्रिका  म्हणजेच आपल्या आधीच्या जन्माच्या  चांगल्या कर्मांचा raincheck !

सध्या  २ नोव्हेंबर २०१४ पर्यंत कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीला साडेसाती सुरु आहे . २ नोव्हेंबर २०१४ ला कन्येची साडेसाती संपेल शनि वृश्चिक राशीत प्रवेश  करेल आणि ३ नोव्हेंबर २०१४ पासून तूळ आणि वृश्चिक राशीबरोबर धनु राशीला साडेसाती सुरु होईल . त्यानंतर साधारण अडीच वर्षांनी  शनि धनु राशीत प्रवेश करेल आणि तूळ राशीची साडेसाती संपेल व मकर राशीची सुरु होईल .