Title

Astrology Blog by Anagha Bhade


Thursday 3 April 2014

ज्योतिष शास्त्र का , कशासाठी ?

ज्योतिषशास्त्र का , कशासाठी ? हा प्रश्न बर्याच वेळा लोकांना पडतो . मला पण हाच प्रश्न पडला होता . आमच्या  घरात  म्हणजे माहेरी पत्रिका , ज्योतिष वगेरे विषय फारसे कधी ऐकले नव्हते अगदी नाही म्हणायला माझे पणजोबाना जे माझ्या जन्माच्या आधीच वारले , ह्या विषयात रस होता व त्यांचा त्याबाबतीत बराच अभ्यास होता असे माझ्या आजीकडून व पणजीआजीकडून ऐकले होते .  तसेच माझ्या आजीचा भाऊ म्हणजे माझे मामाआजोबाना ह्या विषयात बराच interest होता . पण अर्थातच त्यामुळे  माझा ह्या विषयाशी सबंध येणे अवघडच होते .
माझ्या आई बाबांचा लग्नात साधारण जी पत्रिका बघितली जाते म्हणजे गुणमिलन करता तेवढाच सबंध !  ( जे आता कळतंय कि ' किती गुण जमले ' हे फारसे महत्वाचे नाही . पत्रिका बघायचीच असेल तर सखोल बघितली पाहिजे म्हणजे ग्रहयोग , महादशा वागेरेचा निट अभ्यास केला पाहिजे . नुसते अमके गुण जमले ह्याला तसा फारसा अर्थ नाही . ) त्यामुळे घरात ह्या विषयाची अजिबात चर्चा होत नसे .

माझे  लग्न झाले नंतर  काही काळ इथे नोकरी मग नवर्याच्या जॉब मुळे  अमेरिकेत बरीच वर्षे होते आणि आधीच्या लेखात उल्लेख केला तसा भारत भेटी करता एकदा आले असताना शरद उपाध्ये ह्यांचा 'भविष्यावर बोलू काही ' हा कार्यक्रम  बघण्यात आला आणि मग ह्या विषयाकडे माझे लक्ष गेले . तेव्हा मला 'ज्योतिषशास्त्र का , कशासाठी ?' हा प्रश्न पडला . एक म्हणजे जर पूर्ण ज्योतिष शास्त्र हे कर्म सिद्धांतावर अवलंबून आहे ह्याचा अर्थ कि आपण चांगले कर्म केले कि चांगलीच फले  मिळणार आणि जे नशिबात आहे ते होणारच असेल तर मग कशासाठी पत्रिका / ज्योतिष बघायचे ? पण त्याच वेळेस  मग अतिशय साधी सरळ , कधी कोणाचे वाईट न केलेली माणसे आणि त्यांची काही दुखे: मला जास्त प्रकर्षाने दिसू लागली . उदाहरणच द्यायचे झाले तर माझा सख्खा  मामा ऑफिस म्हणून जायला बाहेर पडला ,एका ट्रक च्या धडकेमुळे त्याचा अपघात झाला व त्यातून तो वाचू शकला नाही . त्यावेळेस माझा मामेभाऊ अवघा ४-५ वर्षांचा होता . आजी ,  आजोबा ,मामी आणि घरातले इतर ह्या सर्वांना  हा धक्का खूप मोठा होता . ह्या घटनेचा  जेव्हा विचार करते तेव्हा सतत का बरे असे झाले ? माझ्या आजी-आजोबांनी , मामीनी असे काय बिघडवले होते कोणाचे ? माझ्या मामेभावाकडून  का देवाने पित्याचे सुख हिरावून घेतले असे प्रश्न पडतात . त्यावेळेस वाटते कि नुसती ह्या जन्मी केलेली चांगली कर्मे पुरेशी नसावीत त्या पलीकडेही काही आहे . कदाचित असा विचार करून आपण आपलीच समजूत घालतोय असाही विचार मनात आला . 

अशी बरीच उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर घडत असतात . कोणाला खूप प्रयत्न करून मुल  न होणे , कोणाचे जोडीदाराशी न पटणे सतत भांडणे होत राहणे मग घटस्फोट , मनस्ताप होणे, कोणाला सतत आर्थिक प्रोब्लेम्स असणे , शिक्षण आणि पात्रता असतांना मनासारखा जॉब न मिळणे इ. 

अर्थात आपले माणूस आपल्याला कायमचे सोडून जाणे हे जगातले सगळ्यात मोठे दुख: आहे असे मला वाटते . 
काही गोष्टी आपल्या हातात नसतात काही भोग भोगल्याशिवाय सुटका नाही हे खरेच परंतु काही गोष्टी आपल्याला सुधारता येऊ शकतील का ? असे  वाटू लागले . उदा नोकरी , व्यवसाय , जोडीदाराची निवड , काहि टाळता येण्यासारखे आजार , काही मानसिक त्रास इ. 

जेव्हा उत्सुकतेपोटी का होईना सुरुवातीला जेव्हा ह्या विषयाचा अभ्यास सुरु केला तेव्हा जाणवले कि पत्रिका म्हणजे आपल्या पूर्वजन्मीच्या पाप/ पुण्याचा आराखडा आहे . जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा पत्रिकेशी ताडून बघता त्याची उत्तरे सापडू लागतात  . उदा वैवाहिक सौख्य नसणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत शुक्र ,सप्तम स्थान , सप्तमेश ,   बिघडलेले असणे म्हणजे पापग्रहाच्या युतीत  केंद्रयोगात ,  प्रतियोगात असणे तसेच महादशा पण सप्तम स्थानाला म्हणजे वैवाहिक सौख्याला विरोध करणार्या षष्ठ आणि व्यय स्थान प्रामुख्याने देणाऱ्या आढळतात . ह्याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रात  जे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने शुक्राचे कारकत्व सांगितले आहे तसेच सप्तमेश आणि सप्तम स्थान ह्यांचे महत्व पटते . 

मग अशावेळेस विवाहासाठी पत्रिका बघताना नुसता गुण मिलनाचा विचार पुरेसा नाही त्य पत्रिकेत वैवाहिक सौख्य  आहे कि नाही हे बघणे महत्वाचे आहे तसेच मग संतती सूख  , वयोमर्यादा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे . 
आता पत्रिका बघून काय होणार जे व्हायचे ते तर होणारच आहे न असा प्रश्न पडतो त्यावेळेस कदाचित विवाह जुळवतना 
ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मग पत्रिका जुळते आहे का ते पहिले तर कदाचित एखादा घटस्फोट टाळता येऊ शकतो . 

अजून एखादे उदाहरण द्यायचे झाले तर ,आता समजा एखाद्याच्या पत्रिकेत मुल होण्याचा योग आहे परंतु abortion होणे 
किंवा एखाद्या treatment ला यश न मिळणे वगेरे गोष्टी होत  असतात.अशावेळेस मानसिक, शाररीक आणि आर्थिक दृष्टीने नुकसान होत असते . तेव्हा दशा / अंतर्दशा जेव्हा अनुकूल असेल तेव्हा प्रयत्न करा असे सांगता येते . 

पत्रिकेतील एकंदर ग्रहस्थिती ,महादशा ह्यांचा विचार करून शिक्षणाची शाखा सुचवता येते . तसेच एखाद्याला योग्य नोकरी / व्यवसायाचे क्षेत्र सुचवता येऊ शकते . कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत  मार्गदर्शन मिळू शकते तसेच आत्ताचा काळ चांगला नसला तरी पुढचा काळ चंगला आहे प्रयत्न करत राहा हा आशावाद पत्रिकेतून मिळू शकतो किंवा एखादी गोष्ट मनासारखी घडणार नसेल तर ती accept करण्याची मानसिक तयारी होऊ शकते . 

एकंदर  ज्योतिषी पत्रिकेतून कौन्सेलिंगच करत असतो असे म्हणणे गैर ठरणार नाही . आपल्या पूर्वजांनी जे ज्ञान साठवले आहे त्याचा सुयोग्य वापर करून जीवन नक्कीच सुसह्य बनवता येईल . 

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे अयोग्यच आणि  प्रत्येक गोष्टीचा पत्रिकेशी सबंध लावणे पण मला योग्य वाटत नाही . 
प्रयत्न तर करावेच लागतात त्याला पर्याय नाही परंतु प्रयत्नांची दिशा मात्र ह्यातून सापडू शकते .  जिथे अडचणी आहेत 
प्रोब्लेम्स आहेत confusions आहेत अशावेळेस ज्योतिष शास्त्राचा उपयोग मार्गदर्शक म्हणून नक्कीच होतो असे मला वाटते . 





No comments:

Post a Comment