Title

Astrology Blog by Anagha Bhade


Saturday 26 April 2014

साडेसाती - शनि महाराजांचे ऑडिट

बऱ्याच लोकांना पत्रिकेबद्दल फारसे माहित नसले तरी साधारणपणे स्वत: ची रास माहित असते आणि रास माहिती असण्याचा उपयोग म्हणजे मुख्यत्वे राशी भविष्य वाचण्यासाठी  होतो नाहीतरी ' मला साडेसाती कधी आहे ? ' हे  बघण्यासाठी होतो . स्वत: च्या आयुष्यात जरी काही मनासारखे होत  नसेल , तब्येतीच्या काही तक्रारी असतील नाहीतर आर्थिक प्रोब्लेम्स सगळ्या अप्रिय गोष्टींचा आणि मनस्तापाचा सबंध लोक बर्याच साडेसातीशी  लावत असतात .

सगळ्यात आधी साडेसाती म्हणजे काय ते पाहू ,

जेव्हा गोचर शनि जन्मकुंडलीतील चंद्राच्या व्ययात , चंद्रावरून व चंद्राच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करतो त्यावेळेस साडेसाती आहे असे म्हणतात . ( शनि एका एकाराशीत अडीच वर्षे असतो त्यामुळे एकूण २. ५ +२. ५+२. ५=७. ५ )
उदा . जर एखादा माणूस तूळ राशीचा आहे तर जेव्हा गोचर ( transit ) शनि कन्येत जाईल तिथपासून ह्या माणसास साडेसाती सुरु झाली असे म्हणतात . गोचर शनि कन्या , तूळ , वृश्चिक ह्या राशीतून जाईल तो पर्यंत तूळ राशीला साडेसाती आहे असे म्हणतात एकदा का शनि धनु राशीत गेला कि तुळेची साडेसाती संपली . मग वृश्चिक राशीच्या माणसास साडेसाती सुरु .

साडेसाती मध्ये वाईटच होते असे काही नाही . बर्याच वेळा साडेसाती मध्ये जबादारी वाढते  अर्थात चांगल्या अर्थाने म्हणजे लग्न होणे मुल होणे इ. पण साडेसातीच्या साडेसात वर्षांमध्ये होणार्या वाईट घटनांचा सबंध फक्त शनीची अवकृपा  म्हणून लावला जातो  .साडेसाती म्हणजे शनीचे audit ! तुम्ही केलेल्या चांगल्या व वाईट कर्मांचा तुमच्यावर होणारा परिणाम . नुसती साडेसाती आहे म्हणून त्रास होईल असे नाही तर  समजा दशा ,गोचर ग्रह हे पण जर विरोधात असतील तर साडेसातीचा त्रास होतो . तसेच तुमच्या पत्रिकेत जर तुमच्या राशीत ( म्हणजे चंद्र रास ) , चंद्राच्या मागच्या किंवा पुढच्या स्थानात जास्त ग्रह असतील किंवा साडेसाती दरम्यान शनीची दृष्टी ज्या स्थानावर पडणार आहे तिथे खूप ग्रह असतील तर साडेसाती मध्ये शनि तेवढ्या ग्रह वरून भ्रमण करेल व त्या स्थानावर दृष्टी टाकेल व त्रास कदाचित जास्त होईल . उदा : जर तूळ रास आहेत जन्मपत्रिके मध्ये जास्त ग्रह तुळेत ,कन्येत किंवा वृश्चिकेत असतील तर साडेसातीचा त्रास कदाचित जास्त होईल ( परत दशा बाकी गोचर हे बघावे लागेलच ) .


चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे त्यामुळे जेव्हा गोचर शनि तुमच्या जन्म राशीतून म्हणजे चंद्रावरून भ्रमण करतो (साडेसातीमधील मधली अडीच वर्षे )तेव्हा मानसिक त्रास तणाव शनि निर्माण करतो तुम्ही त्याच्या ह्या कसोटीतून चांगले तावून सुलाखून बाहेर येता  . अहंकार असणाऱ्या माणसाना अशा वेळेस  खुप त्रास होतो पण जो माणूस आधीपासूनच जमिनीवर आहे  . ' मी , माझे , माझ्यामुळे ' ह्या  शब्दांपासून लांब आहे त्याला शनिच्या साडेसाती  चा फारसा  त्रास होत  नाही  कारण शनि हा ग्रह जीवाला शिवाचे रूप दाखवणारा आहे . साडेसाती मध्ये माणूस बर्याच वेळा परिस्थिती मुळे  हतबल होतो . साडेसाती माणसाला संयम शिकवते , अधिक परिपक्व बनवते . 

बर्याच वेळा साडेसाती चा त्रास कमी होण्यासाठी उपाय काय ? असे विचारले जाते . दर शानिवारी शनि मंदिरात तेल घालणे , शनीचा मंत्र म्हणणे वगेरे उपाय सांगितले जातात त्याने खरेतर बहुतेक माणसाला चांगले कर्म करण्याची बुद्धी होत असावी आणि अहंकार कमी होत असावा असे वाटते  . समजा तुम्ही शनि मंदिरात जाताय ,मंत्र म्हणताय पण ते फक्त कोणीतरी  सांगितले म्हणून आणि एकीकडे घरातील स्वत: च्याच आई वडिलांशी निट  वागत नाही आहात , पैशाचा माज आहे , भ्रष्टाचार , काळा  पैसा मिळवण्यात मग्न आहात तर शनि महाराजाची शिक्षा भोगणे अटळ  आहे .
चांगल्या कर्मानीच शनि महाराज प्रसन्न होतील . 

आपल्या आयुष्यात चांगला , वाईट काळ खरेतर  येत जात असतोच .ते पत्रिकेतील एकंदर ग्रहयोग व महादशेवर अवलंबून आहे . पण सर्वसामान्य माणसाला ज्याचा ज्योतिषशास्त्र ह्या विषयाशी सबंध  नाही त्याला महादशा आणि ग्रहयोग ह्या  विषय ी फारशी माहिती नसते . सगळ्या वाईट घटनांचा सबंध फक्त  साडेसातीशी लावला जातो  . सगळ्यांना कोणती न कोणती महादशा जन्मभर चालूच असते  मग कधी प्रगती करणारी किंवा मग त्रासदायक किंवा मग विशेष वाईटही नाही किंवा फार चांगली पण नाही .  ज्या माणसाच्या दशा  पण नेमक्या साडेसातीच्या काळात
त्रासदायक असतात त्यांना बराच त्रास होण्याची शक्यता असते . महादाशेबद्दल एक वेगळा लेख लिहीनच पुढे .

शनि हा तुमच्या कर्माचे मोजमाप तुमच्या पदरात घालतो . चांगल्या कर्मांची चांगली फळे देतो  आणि मूळ पत्रिकेतील ग्रहयोग आणि महादशा  चांगल्या असतील आणि ह्या जन्मी पण कर्म चांगलीच असतील तर शनि कसा त्रास देईल नाही का ?  शेवटी चांगली पत्रिका  म्हणजेच आपल्या आधीच्या जन्माच्या  चांगल्या कर्मांचा raincheck !

सध्या  २ नोव्हेंबर २०१४ पर्यंत कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीला साडेसाती सुरु आहे . २ नोव्हेंबर २०१४ ला कन्येची साडेसाती संपेल शनि वृश्चिक राशीत प्रवेश  करेल आणि ३ नोव्हेंबर २०१४ पासून तूळ आणि वृश्चिक राशीबरोबर धनु राशीला साडेसाती सुरु होईल . त्यानंतर साधारण अडीच वर्षांनी  शनि धनु राशीत प्रवेश करेल आणि तूळ राशीची साडेसाती संपेल व मकर राशीची सुरु होईल . 

No comments:

Post a Comment