Title

Astrology Blog by Anagha Bhade


Wednesday 16 April 2014

जुळून येती रेशीमगाठी !

जुळून येती रेशीमगाठी ! लेखाच्या नावावरून वाटले असेल तुम्हाला कि मराठी मालिकेविषयी काहीतरी आहे का ? आणि  ज्योतिष विषयक ब्लोग वर का  ? तर हे कोणत्याही मालिकेबद्दल नसून सर्वसाधारण पणे आपल्याकडे जी arranged  marriage होतात त्या विषयी आहे . बरेच जण  मुला / मुलीचे लग्न म्हटले कि ' पत्रिका बघणार आहोत ' म्हणजेच गुणमेलन झाले तरच पुढे ते ' स्थळ' बघू असे सांगतात . आता असे गुणमेलन करणे म्हणजे काय तर वधू  वराचे जन्म
नक्षत्रावरून  किती गुण जमत आहे ते पाहणे . हे पंचागात बघून लगेच काढता येते . ठराविक गुण जमले तर ठीक नाहीतर पत्रिका जुळत नाही असे म्हणून सरळ ते ' स्थळ ' reject केले जाते . आता गुणमेलानाची हि पद्धत मला तरी योग्य वाटत नाही . अशाप्रकारे पत्रिका बघण्याचा एकमेव फायदा कदाचित ' स्थळ' फारसे मान्य नसेल तर नकार द्यायला कारण म्हणून फार फार तर होईल .
मग पत्रिका बघूच नये का ? खरेतर 'जे होईल ते बघू  ,सगळीच लोक कुठे पत्रिका बघतात ? पण त्यांचे संसार होतातच न चांगले , कशाला ह्या फंदात पडा ' एकतर हा attitude चांगला पण पत्रिका बघायच्या नावाखाली फक्त गुणमेलानाला महत्व देवून 'उगाचच पत्रिका जमत नाही ' असा बाऊ करण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते .
मग पत्रिका बघायचीच असेल तर काय बघायला पाहिजे ? ह्याचे उत्तर म्हणजे पत्रिका सखोल सगळ्या दृष्टीने बघायला हवी . पत्रिकेत वैवाहिक सौख्य कसे आहे ? आयुष्य कसे आहे ? संतती सुख कसे आहे ? पत्रिकेत पुढे येणाऱ्या महादशा ह्या सगळ्या दृष्टीने कशा आहेत ? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा .
विवाह संबंधी माहिती माझ्या आधीच्या काही लेखांमध्ये दिली आहेच.

विवाह ( सप्तम स्थान ) http://anaghabhade.blogspot.in/2013/11/blog-post_23.html

घटस्फोट http://anaghabhade.blogspot.in/2013/11/blog-post_9537.html

त्यामुळे मला वाटते  कि पत्रिका बघायचीच असेल तर फक्त गुणमेलन करू नका सखोल बघा त्यातूनच योग्य मार्गदर्शन होईल . 

No comments:

Post a Comment