Title

Astrology Blog by Anagha Bhade


Monday 5 May 2014

मंगळ दोष ( Mangalik ) ????

पत्रिकेतील मंगळाचे लग्न ठरवताना एक वेगळेच महत्व आहे . ' मंगळ आहे ' किंवा ' मंगळ दोष आहे ' किंवा मग' मांगलिक आहे' हे  शब्द बर्याच वेळेला एकू येतात . पण 'मंगळ  असणे 'म्हणजे काय ते आधी बघू आणी मग त्या मंगळ  असण्याला कितपत महत्व द्यायचे ते तुम्ही स्वत :च ठरवू शकता .

मंगळ आहे म्हणजे पत्रिकेतील १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ  असणे . दक्षिणेत द्वितीय स्थानातील मंगळ  पण 'मंगळ दोष 'धरतात. पण ह्या स्थानात नुसता मंगळ  असला तरी तो कोणत्या राशीत आहे ? रवि बरोबर आहे का ? कोणत्या ग्रहाच्या दृष्टीत  आहे ? इ . बाबींवर 'मंगळ  दोष ' असणे अवलंबून आहे . परत त्यात सौम्य मंगळ व कडक मंगळ हे प्रकार पण आहेतच . 

मंगळाला चौथी , सातवी , आठवी  असते . जेव्हा मंगळ  १, ४, ७आणि १२ ह्या स्थानात असतो तेव्हा तो सप्तमस्थानाला  ( विवाह स्थान ) दृष्टी ठेवून असतो .

सर्वप्रथम ह्याला ' मंगळ दोष ' का म्हणत असावेत त्याचे लॉजिक बघुयात . मंगळ हा मुळात एक पापग्रह धरला आहे . मंगळ म्हणजे आक्रमकता , धडाडी , प्रसंगी राग , सडेतोड स्वभाव . मंगळाच्या स्वभावात ' जमवून घेणे किंवा नमते घेणे '   हे प्रकार नाहीतच त्यामुळे नवरा- बायको हे नाते टिकण्यासाठी जी adjustment / compromises करावे लागतात त्यात मंगळाचा उपयोग तर नाहीच पण विरोधच जास्त होईल . त्यामुळे सप्तम स्थानावर ( विवाह स्थान ) जर मंगळाची दृष्टी असेल तर अर्थातच कदाचित तो त्याच्या अंगभूत स्वभावामुळे  नात्यामध्ये ताण आणू  शकेल . पण ह्यासाठी मंगळ पत्रिकेत किती प्रभावी आहे हे बघणे आवश्यक आहे . 

सर्वसामान्यपणे  'मंगळ आहे ' म्हणजे पत्रिकेतील १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ  असणे . परंतु खालील पैकी जर मंगळाची स्थिती असेल तर तो निर्दोष मानतात . ( निर्दोष म्हणजे ' मंगळ  असण्याचा ' कोणताही अपाय नाही . त्यामुळे ' मंगळ  आहे ' म्हणून घाबरू नये . )  

पंचांगात जे 'निर्दोष मंगळाचे 'नियम दिले आहेत ते खालीलप्रमाणे : 

मंगळ कर्क राशीत ( नीच राशीत ) , मिथुन किंवा कन्या राशीत ( त्याच्या शत्रू राशीत ) असल्यास , मंगळ  रवि बरोबर म्हणजे अस्तंगत असल्यास , प्रथमत मेषेचा , चतुर्थात वृश्चिक राशीत , सप्तमात मकर राशीत , अष्टमात सिंह राशीत आणि बाराव्या स्थानी धनु राशीत असल्यास  मंगळ  निर्दोष समजतात . 
आता ह्या सगळ्या  नियमानुसा जर मंगळ निर्दोष होत नसेल आणि जर शुभ ग्रहांच्या दृष्टीत असेल तर सौम्य मंगळ आहे असे म्हणतात . 
आता समजा एवाढे फिल्टर्स लावून ' सदोष मंगळ  निघालाच तर मग वधू  - वरांच्या दोघांच्याही पत्रिकेत सदोष मंगळ असेल तर चालते किंवा समजा एकाच्या पत्रिकेत सदोष मंगळ  आहे व दुसर्याच्या पत्रिकेत १,४,७,८,१२ ह्या स्थानात शनि असेल तर किंवा शनीची दृष्टी सप्तमावर असेल तर प्रथमात किंवा सप्तमात गुरु / शुक्र असेल तर अथवा  सप्तमावर त्यांची दृष्टी असेल तर किंवा  प्रथमात किंवा सप्तमात राहू - केतू असतील तर  अशी पत्रिका पण ' मंगळ असणाऱ्या पत्रिकेला चालु  शकते . 

एका दिवसात १२ लग्न राशी (दर दोन तासानी एक लग्न रास बदलत असते ) आणि १२ लग्न राशींच्या पत्रिके पैकी ५ लग्न राशीच्या पत्रिकेत एक तर १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ येणार म्हणजे ह्या लोकांच्या पत्रिका ' मंगळ आहे ' ह्या category  मध्ये जाणार . 

सदोष मंगळ असण्याच्या नियमांबरोबर अशावेळेस मंगळाची अवस्था ( बाल , कुमार, युवा , वृध्द, मृत  ) पण बघायला हवी कारण त्यातल्या त्यात कुमार आणि त्याही पेक्षा जास्त युवा अवस्थेतील मंगळ जास्त त्रासदायक होईल बाल ,वृद्ध 
आणि त्यामानाने मृत ग्रह काय प्रभाव टाकणार ? 

माझ्यामते एखादी वाईट घटना  हि कोणत्याही एका पापग्रहा मुळे  कधीही होत नाही तर त्या पापग्रहांचे इतर ग्रहांशी असलेले कुयोग ह्यांच्यामुळे घडत असते . त्यामुळे एकटा मंगळ  पण काय करणार , नाही  का  ? 
खरे बघायला गेले  तर शनी , राहू  , हर्षल हे पण पापग्रह धरले आहेत पण लग्नाच्या वेळेस मात्र मंगळालाच महत्व !

मला वाटते मंगळ हा लग्न ठरवताना पत्रिकेतील एक overrated ग्रह आहे . बघा , म्हणजे  उगाचच मंगळाला घाबरण्याचे 
कारण नाही . अगदी नियमाप्रमाणे पहिले तरी नुसते 'मंगळ  असण्याला 'सुद्धा बरेच अपवाद आहेत . त्यामुळे ' मंगळ आहे ' ह्या प्रकारचा फारसा बाऊ करू नये . 


1 comment:

  1. Great content sir
    - The news these days is full of political infighting, climate change, global crises, and nuclear war. To get the right prediction from an Astrologer visit our website and get your all answers related to astrology.

    ReplyDelete